शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थी वसतिगृहाला अखेर मुहूर्त सापडला ‘लोकमत’चा प्रभाव : शुक्रवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:53 IST

कोल्हापूर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून ...

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २२ जणांना प्रवेश; व्यवस्थापनासाठी ५ स्वयंसेवी संस्थांचे अर्ज

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे.या वसतिगृहातील प्रवेशासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूरमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या वसतिगृहात २४ विद्यार्थ्यांसाठी निवासाच्या सुविधेचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम सुरू आहे; त्यामुळे पहिल्या टप्प्यात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील पाच नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी करून त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाईल.या प्रक्रियेला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शुक्रवार (दि. ३) दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन केले जाणार आहे. उद्घाटनाच्या दिवसापासून संबंधित २२ विद्यार्थ्यांना याठिकाणी राहता येणार आहे.शहराबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेशया वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश, प्रारंभाबाबत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी वसतिगृहाचा प्रारंभ होणार असल्याचे सदस्य सचिव प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. ते म्हणाले, वसतिगृहासाठी ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २२ जणांची प्रवेशासाठी निवड केली आहे. खुल्या प्रवर्गातील, कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणाºया आणि कोल्हापूर शहराबाहेरील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. वसतिगृह व्यवस्थापनासाठी नोंदणीकृत पाच संस्थांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी लवकरच पूर्ण केली जाईल.

या वसतिगृहाच्या प्रारंभाला विलंब झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने रविवारच्या (२९ जुलै) अंकामध्ये ‘मराठा वसतिगृहाबाबतची पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली’ या वृत्ताद्वारे मांडले होते.