शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कोल्हापूरचा मराठा मोर्चा राज्याला दिशा देईल

By admin | Updated: September 12, 2016 01:02 IST

विविध मराठा संघटनांचा विश्वास : मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार; १८ सप्टेंबरला व्यापक बैठक

 कोल्हापूर : आतापर्यंत अनेक निर्णय कोल्हापुरात घेतले गेले आणि त्याची राज्यात नव्हे, देशात अंमलबजावणी झाली. याच पद्धतीने अभूतपूर्व असा कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चा हा राज्याला दिशा देईल, असा विश्वास अनेक मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. १५ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या या मोर्चाच्या तयारीसाठी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात रविवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक उपयुक्त सूचना करून मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तो यशस्वी करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक असून, यासाठी प्रत्येकी ३२ सदस्यांचा समावेश असलेल्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार असून, आर्थिक नियोजनासाठी पाच समित्या स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था, बँका, सरकारी कार्यालये, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याशी प्रभावी संपर्क साधण्यात येणार असून, स्वयंसेवकांचीही व्यापक समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपर्कासाठी ७३00 व्हॉटस्अ‍ॅपचे ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. हिंदुराव हुजरे पाटील यांनी शासकीय कार्यालयांतील परवानग्या आणण्याची जबाबदारी घेतली. यावेळी सुरेशदादा पाटील यांनी शिवाजी पेठेतील मराठा पेटून उठला की, मग जिल्ह्यातील मराठा जागा झाला, असे समजा, असे सांगत या मोर्चासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, श्रीकांत पाटील, सचिन तोडकर, राजू सावंत, जयश्री चव्हाण, शैलजा भोसले, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत जाधव, डॉ. प्रल्हाद केळवकर, जयेश कदम, डॉ. सुभाष देसाई, राजेश पाटील, शाहीर दिलीप सावंत, बाबा महाडिक, राम इंगवले, फत्तेसिंह सावंत, मानसिंग घाटगे उपस्थित होते. लोकप्रतिनिधींबरोबर होणार बैठक जिल्ह्यातील आजी, माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कोल्हापूर महानगरपालिकेसह अन्य नगरपालिकांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांची एक व्यापक बैठक रविवारी (दि. १८) जयप्रभा स्टुडिओसमोरील सावंत यांच्या शुभंकरोती सांस्कृतिक भवनमध्ये होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मोर्चाचा मार्ग मोर्चाची सुरुवात गांधी मैदानातून होईल. यानंतर खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, चप्पल लाईनवरून शिवाजी पुतळा, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहणार असल्याचे यावेळी वसंतराव मुळीक यांनी जाहीर केले. आर्थिक मदतीसाठी सीएंची समिती या मोर्चासाठी खर्चही मोठा येणार आहे. भगवे झेंडे, बॅनर, पोस्टर, पॅम्प्लेटसाठी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी पाच समित्या असल्या तरी आर्थिक शिस्त राहावी यासाठी सीएंचीही एक समिती नेमली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ४अभिजित भोसले वैद्यकीय सुविधा पुरविणार ४अंकल ग्रुपकडून होणार पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा ४उमेश पोवार यांच्याकडून दोन हजार ‘टी शर्ट’ तर सत्तापालट होईल यावेळी एक मराठा म्हणून सर्वच लोकप्रतिनिधींनी १८ सप्टेंबरच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतर जर कुणी उपस्थित राहणार नसेल तर त्यांचे काय करायचे, अशी विचारणा एका युवा कार्यक र्त्यांने केली. यावेळी सामील झाले नाही तर सत्तापालट होईल, असा इशारा दिला.