शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मराठा-दलित ऐक्य परिषदेस लाखाहून अधिक लोक अपेक्षित : उत्तम कांबळे

By admin | Updated: November 8, 2016 01:27 IST

परिषदेमुळे होणार सामाजिक अभिसरण : शहाजी कांबळे

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)ची पूर्वीपासूनच मागणी आहे; परंतु पुरोगामी महाराष्ट्रात विविध जातिसमुदायांमध्ये सलोखा कमी होऊन जातीजातींत दरी निर्माण झाली आहे. ती कमी करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) कोल्हापुरात मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.ताराबाई पार्क येथील सासने मैदान येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही परिषद घेण्यात येणार आहे. तिच्या तयारीसाठी अक्षता मंगल कार्यालय येथे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.उत्तम कांबळे म्हणाले, महाराष्ट्राच्या समाजजीवनात मराठा, दलित, ओबीसी, आदिवासी तसेच इतर जातिधर्मांतील लोकांनी एकदिलाने राहावे व जातिजातींत निर्माण झालेली दरी व तेढ कमी होऊन बंधुभाव व सलोखा निर्माण व्हावा, यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे.परिषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले असणार आहेत. परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे असणार आहेत. मार्गदर्शक म्हणून माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार सर्वश्री. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य अच्युत माने, डॉ. कृष्णा किरवले, आदी मार्गदर्शन करणार आहेत.बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे, शामप्रसाद कांबळे, बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, दत्ता मिसाळ, बाळासाहेब वाशीकर, आदी उपस्थित होते.परिषदेमुळे होणार सामाजिक अभिसरण : शहाजी कांबळे