शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची २६ ला मंत्रालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:46 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने २६ नोव्हेंबरला हजारो चारचाकी वाहने घेऊन मंत्रालयावर धडक देणार आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, अशी माहिती सकल मराठा समाज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आता सरकारचे दिवस भरले असून, अजून जास्त काळ ते समाजाला फसवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस, एक तर आरक्षण द्या; अन्यथा चालते व्हा, असा इशाराही त्यांनी दिला.मुळीक म्हणाले, मागासवर्गीय समिती न्यायालयात अहवाल सादर करणार असताना तत्पूर्वी प्रसारमाध्यमांतून समितीचा अहवाल फुटतोच कसा? सरकारच्या हेतूविषयी आम्हाला शंका येत आहे. दसरा चौकातून निघणाऱ्या मोर्चात राज्यातून हजारो गाड्या सहभागी होणार असल्याने मुंबईची कोंडी होईल.दिलीप देसाई म्हणाले, समाजाच्या २२ मागण्या मान्य असल्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले; पण पुढे काहीच झाले नाही. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’ला निधी दिल्याचा डांगोरा पिटला; पण किती तरुणांना लाभ झाला?इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, मराठा आणि कुणबी यांमध्ये फूट पाडून आरक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाचच दिवस चालणार आहे. तेथे अजेंड्यावर आरक्षणाचा विषय नसल्याने सरकारची नियत चांगली दिसत नाही. यावेळी गुलाबराव घोरपडे, स्वप्निल पार्टे, इंद्रजित माने, आकाश पाटील, शरद साळुंखे, दिलीप सावंत उपस्थित होते.शाहू छत्रपती करणार नेतृत्वदसरा चौकातून २६ नोव्हेंबरला निघणाºया मोर्चाचे नेतृत्व शाहू छत्रपती करणार आहेत. त्यांच्यासह ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह खासदार, आमदार यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.मराठ्यांचा संयम बघितला; आता ‘क्रांती’सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली. आतापर्यंत आमचा संयम बघितला. आता ‘क्रांती’ या शब्दाची ताकद दाखवू. भले आम्हाला नक्षलवादी ठरवा; आम्ही घरावर तुळशीपत्रे ठेवूनच रिंगणात उतरलो आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिला....तर पोस्टर फाडूमागासवर्गीय समितीचा अहवाल सादर केल्यानंतर भाजपच्या वतीने श्रेयवादाची पोस्टरबाजी सुरू होईल; पण टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय अशी पोस्टरबाजी केली तर ते पोस्टर फाडू, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला.