शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

मराठा समाजाची २६ ला मंत्रालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:46 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने २६ नोव्हेंबरला हजारो चारचाकी वाहने घेऊन मंत्रालयावर धडक देणार आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, अशी माहिती सकल मराठा समाज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आता सरकारचे दिवस भरले असून, अजून जास्त काळ ते समाजाला फसवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस, एक तर आरक्षण द्या; अन्यथा चालते व्हा, असा इशाराही त्यांनी दिला.मुळीक म्हणाले, मागासवर्गीय समिती न्यायालयात अहवाल सादर करणार असताना तत्पूर्वी प्रसारमाध्यमांतून समितीचा अहवाल फुटतोच कसा? सरकारच्या हेतूविषयी आम्हाला शंका येत आहे. दसरा चौकातून निघणाऱ्या मोर्चात राज्यातून हजारो गाड्या सहभागी होणार असल्याने मुंबईची कोंडी होईल.दिलीप देसाई म्हणाले, समाजाच्या २२ मागण्या मान्य असल्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले; पण पुढे काहीच झाले नाही. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’ला निधी दिल्याचा डांगोरा पिटला; पण किती तरुणांना लाभ झाला?इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, मराठा आणि कुणबी यांमध्ये फूट पाडून आरक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाचच दिवस चालणार आहे. तेथे अजेंड्यावर आरक्षणाचा विषय नसल्याने सरकारची नियत चांगली दिसत नाही. यावेळी गुलाबराव घोरपडे, स्वप्निल पार्टे, इंद्रजित माने, आकाश पाटील, शरद साळुंखे, दिलीप सावंत उपस्थित होते.शाहू छत्रपती करणार नेतृत्वदसरा चौकातून २६ नोव्हेंबरला निघणाºया मोर्चाचे नेतृत्व शाहू छत्रपती करणार आहेत. त्यांच्यासह ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह खासदार, आमदार यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.मराठ्यांचा संयम बघितला; आता ‘क्रांती’सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली. आतापर्यंत आमचा संयम बघितला. आता ‘क्रांती’ या शब्दाची ताकद दाखवू. भले आम्हाला नक्षलवादी ठरवा; आम्ही घरावर तुळशीपत्रे ठेवूनच रिंगणात उतरलो आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिला....तर पोस्टर फाडूमागासवर्गीय समितीचा अहवाल सादर केल्यानंतर भाजपच्या वतीने श्रेयवादाची पोस्टरबाजी सुरू होईल; पण टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय अशी पोस्टरबाजी केली तर ते पोस्टर फाडू, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला.