शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

मराठा समाजाला पदोन्नतीत डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. ...

ठळक मुद्देमराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. विद्यापीठातील या पद्दोनतीच्या प्रकरणांबाबत अपुरी माहिती, असमाधानकारक उत्तरे देणाºया विद्यापीठ प्रशासनाच्या प्रतिनिधींना या शिष्टमंडळाने धारेवर धरले.विद्यापीठात मंगळवारी दुपारी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक झाली. यावेळी उपकुलसचिव पदांची पदोन्नती आणि भरती प्रक्रिया ही शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून झाली आहे. खुल्या प्रवर्गासह मराठा समाजाला डावलण्यात आले आहे, असा आरोप या शिष्टमंडळाने केला. आमचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही. मात्र, राज्यघटना, कायद्याने जे खुल्या प्रवर्गाला दिले आहे ते मिळाले पाहिजे. नोकरभरती आणि पदोन्नतीमध्ये ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, अशी तरतूद राज्यघटनेनुसार करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने १८ आॅक्टोबर १९९७ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सरळसेवा भरती आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी ३२ टक्क्यांहून जास्त केली आहे. त्यामुळे पदोन्नती, भरती प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून बिंदूनामावली समितीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील शिष्टमंडळाने दिला. यावर प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी याबाबतीत ४ आणि १२ आॅगस्टला मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि बिंदूनामावली समितीची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, बिंदूनामावली समितीचे अध्यक्ष प्रकाश राऊत, उपकुलसचिव पी. एस. सोयम, अ‍ॅड. सतीश नलवडे, दुर्गेश लिंग्रस, संग्राम निंबाळकर, बाबा पार्टे, राजू जाधव, रूपाली पाटील, वैशाली महाडिक, नितीन पाटील, कमलाकर जगदाळे, उमेश पोवार, आदी उपस्थित होते.बिंदूनामावली समितीची ४ व १२ आॅगस्टला बैठकया भरती प्रक्रियेची शहानिशा करण्यासाठी पूर्वी १७ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर समितीत अ‍ॅड. सतीश नलावडे, सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील प्रा. जयंत पाटील, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, फत्तेसिंग सावंत यांचा समावेश करण्यात आला. या समितीची बैठक ४ आणि १२ आॅगस्टला होणार आहे.विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तरपदोन्नती, भरती प्रक्रियेबाबत विद्यापीठाचे प्रतिनिधी या बैठकीत माहिती देत होते. मात्र, ते देत असलेली माहिती अपुरी असल्याचे लक्षात येताच ‘आधी पूर्ण माहिती घ्या आणि मग बोला’, अशा शब्दांत सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने सुनावले. शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तर झाले.