शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

एकाच शाळेत एकाच विषयाचे अनेक शिक्षक

By admin | Updated: August 29, 2014 23:40 IST

शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून

कसबा तारळे : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व उच्च प्राथमिक शाळांत पटसंख्येच्या निकषानुसार विषयशिक्षक प्रक्रिया राबविली आहे; परंतु ती राबविताना प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज असताना, एकाच शाळेत एकाच विषयाच्या अनेक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विषय शिक्षक पदाची ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची असून, ती पुन्हा विचारांती राबवावी, अशी मागणी काही ज्येष्ठ शिक्षकांतून व पालकांतून होत आहे.दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्यानुसार विषय शिक्षक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेसाठी राबविण्यात आली. वस्तुत: विद्यार्थी पटनिश्चितीनुसार एकाच शाळेत सर्व विषयांसाठीही वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती होणे गरजेचे असताना एकाच शाळेत एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्याचा वेगळाच अर्थ काढून घाईगडबडीत राबविलेली ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची आहे. त्याचबरोबर ती सप्टेंबर २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाचा पट निश्चित करून करावयास हवी असताना तसे न करता सप्टेंबर २०१२-१३ च्या पटावर पदनिश्चिती करून संबंधित शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांत काही शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यांचे पुन्हा समायोजन कुठे करायचे हासुद्धा गुंता आहे. (वार्ताहर)ज्या-त्या विषयाचे शिक्षक प्रत्येक शाळेत नेमले तर शाळांची तसेच मुलांची गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे काही तज्ज्ञ शिक्षकांचे म्हणणे आहे. या सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करून विषय शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून होत आहे.