शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मिणचेकरांच्या विजयात अनेकांचा ‘हात’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

अंतर्गत घडामोडींमुळे विजय सुकर : राष्ट्रवादीची मदत; काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर

दत्ता बिडकर - हातकणंगले -राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा भगवा फडकविला. त्यांच्या विजयामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी खासदार माने गटाची मदत, पेठवडगाव शहरातील कॉँग्रेस अंतर्गत जुना-नवा वाद, स्वाभिमानी संघटना कार्यकर्त्यांची उघड भूमिका, वारणा कार्यक्षेत्रातील नाराजी, हुपरीसह १३ गावांमध्ये आवाडेंचा आदेश झुगारून शिवसेनेला झालेली मदत आणि कॉँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. कॉँग्रेस पक्षाचा बोलकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने या मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.विधानसभेमध्ये पाचवेळा प्रतिनिधित्व केलेल्या जयवंतराव आवळे यांनी ‘गाव तेथे विकास’ केला असल्याची चर्चा होते. कॉँग्रेसमुळे विकास झाला, असे सांगणारे कार्यकर्ते २००४ पासून २०१४ पर्यंत आपल्या गावावर वचक का ठेवू शकले नाहीत, याचाही विचार करण्याची गरज आहे.हातकणंगलेमध्ये खरी लढत शिवसेना-कॉँग्रेस अशीच झाली. डॉ. सुजित मिणचेकर यांनी गट-तट न पाहता विकासकामांसाठी निधी दिला. कॉँगे्रस-राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी देऊन विकासकामांसाठी पुढाकार घेतला. डॉ. मिणचेकर यांनी गेल्या पाच वर्षांत दलित नेत्यांनाही जवळ केले नाही. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, निवडणुकीपूर्वी शिवशक्ती व भीमशक्ती एकवटल्याने शिवसेनेचा विजय सोपा झाला.राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने गटाने शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे दत्तात्रय घाटगे यांना अवघी ३,८३५ मते मिळाली. त्याचबरोबर लोकसभेला खासदार शेट्टी यांना केलेल्या मदतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. मिणचेकरांना आता मदत केली. कॉँग्रेसचे उदेमवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचाराचे ढिसाळ नियोजन, पेठवडगावमधील जुन्या कॉँग्रेसच्या नेत्यांना, माजी नगरसेवकांना जवळ करणे महागात पडले. त्यातून नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांंची नाराजी, जुन्या-नवा वादाचा फटका कॉँग्रेस उमेदवाराला बसला.वारणेच्या विरोधात नाराजीजनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या गावातच राजीव आवळे कमी पडले. नीलेवाडी-पारगाव ते कुंभोज-नरंदे या वीस ते बावीस गावांमध्ये जनसुराज्य पक्ष २००९ मध्ये पहिला होता. तो २०१४ मध्ये तिसऱ्या स्थानी गेला. वारणा दूध संघाची दूध बिले आणि ‘वारणे’चे ऊस अ‍ॅडव्हान्सचे अर्थकारण जनसुराज्यला भोवले. २००९ मध्ये ५१,१०२ मते घेणारा जनसुराज्य पक्ष २०१४ मध्ये ३२,८७४ मतांवर थांबतो, याला कोण जबाबदार? याबरोबरच उमेदवार राजीव आवळे यांचा संपर्क नाही.