शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिणचेकरांच्या विजयात अनेकांचा ‘हात’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

अंतर्गत घडामोडींमुळे विजय सुकर : राष्ट्रवादीची मदत; काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर

दत्ता बिडकर - हातकणंगले -राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा भगवा फडकविला. त्यांच्या विजयामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी खासदार माने गटाची मदत, पेठवडगाव शहरातील कॉँग्रेस अंतर्गत जुना-नवा वाद, स्वाभिमानी संघटना कार्यकर्त्यांची उघड भूमिका, वारणा कार्यक्षेत्रातील नाराजी, हुपरीसह १३ गावांमध्ये आवाडेंचा आदेश झुगारून शिवसेनेला झालेली मदत आणि कॉँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. कॉँग्रेस पक्षाचा बोलकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने या मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.विधानसभेमध्ये पाचवेळा प्रतिनिधित्व केलेल्या जयवंतराव आवळे यांनी ‘गाव तेथे विकास’ केला असल्याची चर्चा होते. कॉँग्रेसमुळे विकास झाला, असे सांगणारे कार्यकर्ते २००४ पासून २०१४ पर्यंत आपल्या गावावर वचक का ठेवू शकले नाहीत, याचाही विचार करण्याची गरज आहे.हातकणंगलेमध्ये खरी लढत शिवसेना-कॉँग्रेस अशीच झाली. डॉ. सुजित मिणचेकर यांनी गट-तट न पाहता विकासकामांसाठी निधी दिला. कॉँगे्रस-राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी देऊन विकासकामांसाठी पुढाकार घेतला. डॉ. मिणचेकर यांनी गेल्या पाच वर्षांत दलित नेत्यांनाही जवळ केले नाही. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, निवडणुकीपूर्वी शिवशक्ती व भीमशक्ती एकवटल्याने शिवसेनेचा विजय सोपा झाला.राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने गटाने शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे दत्तात्रय घाटगे यांना अवघी ३,८३५ मते मिळाली. त्याचबरोबर लोकसभेला खासदार शेट्टी यांना केलेल्या मदतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. मिणचेकरांना आता मदत केली. कॉँग्रेसचे उदेमवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचाराचे ढिसाळ नियोजन, पेठवडगावमधील जुन्या कॉँग्रेसच्या नेत्यांना, माजी नगरसेवकांना जवळ करणे महागात पडले. त्यातून नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांंची नाराजी, जुन्या-नवा वादाचा फटका कॉँग्रेस उमेदवाराला बसला.वारणेच्या विरोधात नाराजीजनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या गावातच राजीव आवळे कमी पडले. नीलेवाडी-पारगाव ते कुंभोज-नरंदे या वीस ते बावीस गावांमध्ये जनसुराज्य पक्ष २००९ मध्ये पहिला होता. तो २०१४ मध्ये तिसऱ्या स्थानी गेला. वारणा दूध संघाची दूध बिले आणि ‘वारणे’चे ऊस अ‍ॅडव्हान्सचे अर्थकारण जनसुराज्यला भोवले. २००९ मध्ये ५१,१०२ मते घेणारा जनसुराज्य पक्ष २०१४ मध्ये ३२,८७४ मतांवर थांबतो, याला कोण जबाबदार? याबरोबरच उमेदवार राजीव आवळे यांचा संपर्क नाही.