शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

संपूर्ण टोलमुक्तीत अनेक अडचणी

By admin | Updated: August 28, 2014 00:10 IST

सकारात्मक पाऊल आवश्यक : वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करायला हवा

संतोष पाटील -- कोल्हापूर --मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोलमधून कोल्हापूरकरांची ‘मान’ सोडविण्याचे आश्वासन देण्यापूर्वी सावध भूमिका घेतली आहे. ‘महापालिकेला जबाबदारी झटकता येणार नाही, काही भार उचलावाच लागेल’ असेही त्यांनी सूचित केले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती, विकता येणाऱ्या जागांची किंमत, पेट्रोल-डिझेलवरील अधिभार, एचएच-०९ वगळण्याच्या पर्यायाने विकासकाला द्यावी लागणारी मुदतवाढ, त्यामुळे टोलमधून कोल्हापूरकरांच्या मुक्तीमध्ये अनेक अडचणी आहेत; मात्र सकारात्मक दिशेने पाऊल टाकल्यास तोडगा निघणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.कोल्हापुरातील टोलप्रश्न व त्याचा तोडगा यांचा राज्यातील सर्वच टोलनाके व बीओटी प्रकल्पांवर दूरगामी परिणाम होणार आहे. यामुळे टोलप्रश्नी तोडगा काढताना शासन महापालिके च्या सहभागाचा जाणीवपूर्वक विचार करणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता सध्या ५० कोटी रुपयांची उभारणी करणेही अशक्य आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाचे प्रकल्प शहरात सुरू असल्याचे गोंडस चित्र उभे केले जात असले, तरी हिश्श्याची रक्कम उभी करताना महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या आर्थिक वर्षात ११० कोटींचे थेट पाईपलाईनसाठीकर्ज काढावे लागणार आहे. पंधरा वर्षांसाठी दरवर्षी सहा कोटी ७० लाखांचा वर्षाला बोजा पडणार आहे. यापूर्वीच नगरोत्थानचे ५२ कोटी, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट व इतर असा ३७ कोटी ५० लाख रुपये कर्जाचा बोजा असलेल्या पालिकेला टोलच्या नव्या कर्जाचा भार कसा सोसणार? टोलचे पैसे द्यावे लागल्यास त्या खर्चाचा भारही महापालिकेवर अतिरिक्त पडणार आहे. याचा विचारही टोल मुक्तीपूर्वी होणे गरजेचे असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.