शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

कोल्हापूर शहरात अनेक घरांत घुसले पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

कोल्हापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील ...

कोल्हापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरांत पुराचे पाणी शिरल्याने शहरवासीयांना धडकी भरली. पावसाने दिवसभर तारांबळ उडविली. महापालिका अग्निशमन दलांच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. पुराच्या पाण्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले.

शहराच्या सर्वच भागात अतिवृष्टी झाल्यामुळे लहान-मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मोठी गटारी, ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांनाच ओढ्यांचे स्वरूप आले आहे. सखल भागात तसेच ओढ्यांच्या काठावर घरे बांधून राहिलेल्या नागरिकांची आजच्या पावसाने झोप उडाली आहे.

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलाव काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरून वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले. तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरांत पाणी शिरले. पहाटे दारात पाणी आल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घरातील साहित्य पहिल्या माळ्यावर नेऊन ठेवण्याची लगबग सुरू झाली. बघता बघता अनेक घरांत पाणी शिरले.

अग्निशमन दलाची पथके तत्काळ तेथे पोहोचली. त्यांनी नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान, त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरिकांना बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा, अशी विनंती करताच नागरिकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली. जवळपास पन्नास घरांतील नागरिकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.

-कुंभार बांधवांची उडाली धावपळ-

शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली परिसरातील बऱ्याच घरांतून पाणी शिरले. नागरिकांनी स्वत:हून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही कुटुंबांनी केलेल्या गणेशमूर्तीसुद्धा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे सहाव्या गल्लीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सुतारवाडा नागरी वस्तीत पाणी शिरले. तेथील सर्वच कुटुंबांना नजीकच्या चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातही अनेक घरांच्या उंबऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्याठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

-अधिकारी धावले मदतीला -

शहरावर पुराचे संकट ओढवल्यामुळे महापालिका यंत्रणा सक्रिय झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सहायक अधिकारी मनीष रणभिसे यांनी तत्काळ पुराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तींना भेटी दिल्या आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले.