शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

‘ड’ वर्ग नियमावलीत अनेक जाचक अटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:24 IST

राजेंद्र सावंत : अन्याय झाल्यास न्यायालयात

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अनेक जाचक व विकासास बाधक असणाऱ्या अटी आहेत. ही नियमावली जशीच्या तशी लादून कोल्हापूरवर अन्याय झाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्सचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी दिला.असोसिएशनच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सावंत म्हणाले, राज्यातील सर्व ‘ड’ वर्ग महानगरपालिकांना सारखीच नियमावली शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या. कोल्हापूर शहराचा विकास आराखडा मंजूर होऊन व त्यावरील नियमावली अंतर्गत विकसन होऊन १६ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नवीन विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक असताना नवीन विकास आराखडा न करता जुन्या आराखड्याबरोबरची नियमावली रद्द करून नवीन नियमावली लागू करण्याची शासनास घाई का झाली आहे? ज्या विकास आराखड्याअंतर्गत १६ वर्षांमध्ये जुन्या नियमावली अंतर्गत झालेल्या विकसनाचा या नवीन नियमावलीमुळे निर्बंध येणार असल्याचे असोसिएशनतर्फे यापूर्वीच आपल्या शासनाकडील हरकतीमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसणार असून पर्यायाने महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये घट होणार आहे तसेच यामुळे फ्लॅट व घरांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे. त्याचा विचार केल्यास असोसिएशनतर्फे उपस्थित केलेल्या हरकती या कोल्हापूरबाबतीत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कार्यक्रमात प्रारंभी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष सावंत व माजी अध्यक्ष गणपतराव व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आर्किटेक्ट सुनील पाटील, सचिन घाटगे, अभियंता रवीकिशोर माने, प्रसाद मुजुमदार, अभिजित जाधव यांनी तांत्रिकदृष्ट्या मते मांडून शासनाने दडपशाही केल्यास न्यायालयात जाण्यावाचून पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष उमेश यादव, संदीप घाटगे, राज डोंगळे, रवींद्र माने, सुनील मांजरेकर, सुधीर हंजे, महेश ढवळे, परशराम रेमानिचे, सुधीर पाटील, विजय भांबुरे, अतुल शिंदे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधीर राऊत यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)घातक नियमांची दुरुस्ती करावीआमची असोसिएशन या ‘ड’ वर्ग नियमावलीला विरोध करत असून याअंतर्गत कोल्हापूरचा आराखडा व नियमावली १६ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नवीन नियमावली नवीन विकास आराखड्याबरोबर काही घातक नियमांची दुरुस्ती करूनच लागू करावी, अशी मागणी असोसिएशनने केली असल्याचे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, जनतेची बाजू न्यायालयामध्ये सक्षमपणे मांडली जाईल.