शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

कर्जमाफीच्या मंजूर यादीतून अनेक लाभार्थी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आयटी विभागाने केलेल्या पहिल्या मंजूर यादीत जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची नावे दिसत नसल्याने संभ्रमावस्था पसरली आहे. हीच यादी अंतिम ठरणार की पूर्वीच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समिती छाननी होऊन अंतिम मंजुरी मिळणार याबाबत सहकार विभागाच अनभिज्ञ आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतंर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखांपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आयटी विभागाने केलेल्या पहिल्या मंजूर यादीत जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची नावे दिसत नसल्याने संभ्रमावस्था पसरली आहे. हीच यादी अंतिम ठरणार की पूर्वीच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समिती छाननी होऊन अंतिम मंजुरी मिळणार याबाबत सहकार विभागाच अनभिज्ञ आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतंर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखांपर्यंत तर नियमित कर्जाची परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेली तीन-चार महिने याबाबतची प्रक्रिया सहकार विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. आॅनलाईन भरलेल्या अर्जानुसार संबंधित खातेदाराचे लेखापरीक्षण करून याद्या आयटी विभागाकडे अपलोड केल्या आहेत. विविध संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती पदाधिकाºयांच्या याद्या सहकार विभागाने ‘आयटी’ विभागाकडे पाठविल्या आहेत. पण सरकारी कर्मचारी, कर परतावा करणाºयांची माहिती ‘आयटी’ विभागाने घ्यावयाची आहे. या माहितीनुसार ही यादी मंजूर करून तालुकास्तरीय समितीकडे पाठवायची आहे. तालुकास्तरीय समिती त्याला अंतिम मंजुरी देऊन विभागीय व नंतर जिल्हास्तरीय समिती यादी करेल, असे धोरण सहकार विभागाचे होते.एकूणच कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने घाईगडबडीने ‘आयटी’ विभागानेच राज्यातील साडेआठ लाख शेतकºयांची पहिली यादीला मंजुरी देऊन ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शेतकºयांची नावेच सापडत नाहीत. ग्रामपंचायतनिहाय शेतकºयांची नावे आहेत, त्यातून बॅँकेचे नाव शोधून काढल्यानंतर शेतकºयांचे नाव कळणार आहे. ही सगळ्या प्रक्रियेतून नाव शोधणे म्हणजे शेतकºयांसमोर अग्निदिव्यच आहे.‘आयटी विभागा’कडून आलेली यादी अंतिम की तालुकास्तरीय समिती पुढे छाननीसाठी ठेवायची याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतेच आदेश नसल्याने सहकार विभागाच अनभिज्ञ आहे. आज, सोमवारी सहकार विभागाकडून आदेश आल्यानंतरच यादीबाबत पुढील निर्णय होणार आहे.संस्थांचा स्टेशनरी खर्च दुप्पटकेंद्र सरकारच्या कर्जमाफीच्या तुलनेत राज्याच्या कर्जमाफीचे गेल्या तीन महिन्यांत रोज आदेश निघत होते. त्याची माहिती सादर करताना विकास संस्थांची पुरती दमछाक झाली. स्टेशनरीचा खर्चही दुप्पट झाला आहे.बँक-सरकारच्या पातळीवर जमा-खर्च‘आयटी’ विभागाची यादी जरी अंतिम मानली तर लगेच शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग होण्याची शक्यता धूसर आहे. बॅँक व सरकारच्या पातळीवर येणे-देणे हा जमा-खर्च होऊन त्यानंतर बँकांनी मागणी केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत.