शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे कारखानदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST

कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. पण कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने कारखानदार अडचणीत आहेत. ...

कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. पण कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने कारखानदार अडचणीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचीही आर्थिक लूट व मानसिक त्रास होत असल्याचे चित्र आहे. याच्या परिणामी कारखान्यांच्या चिटबॉय व शेतकऱ्यांच्यात तंटे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २१ कारखान्यांचे हंगाम जोमात सुरू आहेत. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७५ ते ८० हजार टन आहे. यासाठी कारखानदारांना स्वतःची तोडणी यंत्रणा राबवावी लागते. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक ऊसतोड मजुरांची संख्या गेल्या पाच वर्षात वेगाने रोडावली आहे. तोडणी यंत्रावर काही कारखान्यांनी भर दिला आहे. पण ऊसतोडणी यंत्राला मर्यादा येत असल्याने ऊसतोड मजूर हाच एकमेव पर्याय राहतो.

जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकच्या सीमाभागातील ऊसतोड मजूर येतात. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती व इतर राज्यात चांगली मजुरी मिळत असल्याने मजुरांनी पाठ फिरवली आहे. यामुळे दैनंदिन गाळपासाठी लागणारा ऊस पुरवठा होत नसल्याने कारखानदार पेचात सापडले आहेत. पुरेशी यंत्रणा नसलेल्या कारखानदारांनी यावर शेतकऱ्यांनाच खुद्दतोड करण्यासाठी उपाय योजला आहे. गेली अनेक वर्षे कारखाने आपल्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणत असल्याने आपला ऊस तोडून आणण्याची जबाबदारी कारखान्यांची असल्याचा मुद्दा समोर ठेवून चिटबॉय व शेती कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. काही ठिकाणी गट ऑफिसला टाळे ठोकण्याचे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे प्रकार होत आहेत.

। चौकट ।।

१)ऊसतोड मजूर जाऊ नयेत याची खबरदारी. मजुरांची कमतरता भासत असल्याने कारखानदार शेतकऱ्यांऐवजी मजुरांची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. गाडी शेताच्या बांधाला लागत असली तरी, ५० ते २०० प्रति टन वरकड मागणी होते.

प्रतिक्रिया

पंढरीनाथ पाटील (शेतकरी)

-- ऊसतोड मजूर ऊस तोडा, बांधा, भरा आणि वरकड द्या अशी मागणी करत आहेत. खुद्दतोडीमुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे.

।। ऊस तोडणी मजुरांचा लेखाजोखा ।।

तोडणी -- प्रतिटन २६९ रुपये

वाहतूक -- प्रतिटन २५ रुपये