शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

मानाच्या गणेशपुजनाने कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 11:28 IST

मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.

ठळक मुद्दे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन डॉल्बी विरहीत मिरवणूक काढून इतिहास घडवण्याचे चंद्रकांतदादांचे आवाहनगाव तिथं निर्माल्य, विसर्जन कुंडदादांनी वाजविला ढोल...

कोल्हापूर, दि. ५ : मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.

यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, कोल्हापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर,शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार, लाला गायकवाड, माजी नगरसेवक आदील फरास, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, अनिल घाटगे, उद्योजक चंद्रकांत जाधव, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, नगरसेवक विजय सुर्यवंशी, विजय करजगार आदी उपस्थित होते.श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांनी सारथ्य करत ही पालखी मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली. यावेळी मिरजकर तिकटी येथे तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या कोल्हापूर -वैभववाडी या ‘अंबाबाई एक्सप्रेस ’ ला हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले.इतिहास घडवा

गेले दहा बारा दिवस डॉल्बी विरहीत मिरवणूक काढण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यास अनुसरुन यंदाची कोल्हापूरसह राज्यभरातील गणेश विसर्जन मिरवणूक ‘न भूतो न भविष्यती’अशी होईल. यात महीलांसह बालकांचाही सहभाग असेल. कारण मंडळे यंदा कर्णकर्कश आवाजाचे डॉल्बीचे राक्षस मिरवणूकीत लावणार नाहीत आणि ते मंडळांनी लावू नयेत. यासाठी पर्यायी परंपारिक वाद्यांचा गजर चांगला आहे, त्याचा वापर करावा. डॉल्बीविरहीत मिरवणूक काढून राज्यात कोल्हापूरचे नाव होऊ दे आणि इतिहासही घडू दे, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.गाव तिथं निर्माल्य, विसर्जन कुंडमिरवणूकीच्या उदघाटनानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्याशी चर्चा करताना गायकवाड यांनी ‘ गाव तिथ निर्माल्य व गणेश विसर्जन कुंड’ अशी संकल्पना पालकमंत्र्यांसमोर मांडली. पाटील यांनी तत्काळ त्यास होकार देत गावे जर श्रमदानातून असे कुंड करणार असतील तर आम्ही त्यांना साहित्य पुरविण्यास तयार आहोत, असे सांगितले.दादांनी वाजविला ढोल...

डॉल्बीविरहीत मिरवणूकीच्या यशानंतर व मानाच्या ‘श्री ’ च्या पालखीचे सारथ्य केल्यानंतर चंद्रकांतदादांना ढोल ताशा पथकाच्या तडतडाटामुळे ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही काळ ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीचा आनंद व्यक्त केला.