शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आंबेओहोळचा घोळ : भाग २ (उत्तरार्ध)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST

आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर जमीन पाण्यापासून १७ वर्षे वंचित राम मगदूम । गडहिंग्लज : १९९८ मध्ये आंबेओहोळ ...

आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर जमीन पाण्यापासून १७ वर्षे वंचित

राम मगदूम । गडहिंग्लज : १९९८ मध्ये आंबेओहोळ प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हापासून ५ वर्षात म्हणजेच २००३ मध्ये धरण पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे लाभक्षेत्रातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर कोरडवाहू जमीन पाण्यापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे वर्षाला २० कोटीप्रमाणे शेतकऱ्यांना ३५० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले असून शासनालाही धरणाच्या अतिरिक्त २०० कोटीच्या खर्चाचा भुर्दंड बसला आहे. २००१ पर्यंत धरणासाठी शासनाकडून रुपयादेखील मिळाला नाही. त्यानंतर ९ कोटीचा निधी मिळाल्यानंतर २००१ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतु, त्यानंतरदेखील एकरकमी निधी आणि बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जमीन उपलब्ध न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले. त्यामुळे जमिनीच्या बदल्यात हेक्टरी ३६ लाखाच्या भरपाईचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आला. सध्या पुनर्वसनाचे कामदेखील जवळपास ८० टक्क्यापर्यंत झाले आहे. ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३०७ भूखंड देय असून त्यासाठी लिंगनूर क।। नूल व कडगाव येथे १४१ भूखंड उपलब्ध करून त्याठिकाणी नागरी सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. प्राधान्य यादीनुसार हे भूखंड वाटण्यात येणार आहेत. परंतु, आर्थिक पॅकेज घेणाऱ्यांना भूखंड मिळणार नाही.

दरम्यान, विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषाचा फटकाही बसला. परंतु, दुर्गम व डोंगराळ भागातील प्रकल्प म्हणून निधी मिळायला सुरुवात झाली. परंतु, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि धरणग्रस्त संघटनांच्या भूमिकेतील विसंगतीमुळे पुनर्वसनाचे आणि पर्यायाने धरणाचेही काम रखडले. त्यानंतर आता प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्यामुळेच त्याच्या राजकीय लाभासाठीच श्रेयवादाची जुगलबंदी सुरू झाली आहे. (उत्तरार्ध)

---------------------------------

* पुनर्वसनाची स्थिती

- बाधित एकूण खातेदार - ८२२

- पुनर्वसनपात्र खातेदार - ४६७

- स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारलेले - ३५५

- आर्थिक पॅकेज स्वीकारलेले - २५४

- ९६ प्रकल्पग्रस्तांना वाटलेली जमीन - १०६ हेक्टर

- पर्यायी जमिनीसाठी आणखी हवे - २५ हेक्टर

---------------------------------

* प्रकल्प का रखडला ?

निधीची कमतरता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि धरणग्रस्त संघटनांमधील समन्वय आणि नेमक्या भूमिकेचा अभाव.

---------------------------------

* काय करायला हवे ?

मेअखेरीस घळभरणीचे काम पूर्ण करून येत्या जूनमध्ये धरणात २६.९५ द.ल.घ.मी. पाणी साठविणे आणि २ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सुसंवाद घडवून आणायला हवा. संकलन दुरुस्ती व आर्थिक पॅकेजचे करारनामे तातडीने पूर्ण करणे आणि पुनर्वसनासंदर्भात कोणताही प्रतिसाद न दिलेल्या ८८ प्रकल्पग्रस्तांचेही पुनर्वसन कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.