शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

आंबेओहोळचा घोळ : भाग २ (उत्तरार्ध)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST

आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर जमीन पाण्यापासून १७ वर्षे वंचित राम मगदूम । गडहिंग्लज : १९९८ मध्ये आंबेओहोळ ...

आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर जमीन पाण्यापासून १७ वर्षे वंचित

राम मगदूम । गडहिंग्लज : १९९८ मध्ये आंबेओहोळ प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हापासून ५ वर्षात म्हणजेच २००३ मध्ये धरण पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे लाभक्षेत्रातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६३५९ हेक्टर कोरडवाहू जमीन पाण्यापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे वर्षाला २० कोटीप्रमाणे शेतकऱ्यांना ३५० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले असून शासनालाही धरणाच्या अतिरिक्त २०० कोटीच्या खर्चाचा भुर्दंड बसला आहे. २००१ पर्यंत धरणासाठी शासनाकडून रुपयादेखील मिळाला नाही. त्यानंतर ९ कोटीचा निधी मिळाल्यानंतर २००१ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतु, त्यानंतरदेखील एकरकमी निधी आणि बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जमीन उपलब्ध न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले. त्यामुळे जमिनीच्या बदल्यात हेक्टरी ३६ लाखाच्या भरपाईचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आला. सध्या पुनर्वसनाचे कामदेखील जवळपास ८० टक्क्यापर्यंत झाले आहे. ४६७ प्रकल्पग्रस्तांना ३०७ भूखंड देय असून त्यासाठी लिंगनूर क।। नूल व कडगाव येथे १४१ भूखंड उपलब्ध करून त्याठिकाणी नागरी सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. प्राधान्य यादीनुसार हे भूखंड वाटण्यात येणार आहेत. परंतु, आर्थिक पॅकेज घेणाऱ्यांना भूखंड मिळणार नाही.

दरम्यान, विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषाचा फटकाही बसला. परंतु, दुर्गम व डोंगराळ भागातील प्रकल्प म्हणून निधी मिळायला सुरुवात झाली. परंतु, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि धरणग्रस्त संघटनांच्या भूमिकेतील विसंगतीमुळे पुनर्वसनाचे आणि पर्यायाने धरणाचेही काम रखडले. त्यानंतर आता प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्यामुळेच त्याच्या राजकीय लाभासाठीच श्रेयवादाची जुगलबंदी सुरू झाली आहे. (उत्तरार्ध)

---------------------------------

* पुनर्वसनाची स्थिती

- बाधित एकूण खातेदार - ८२२

- पुनर्वसनपात्र खातेदार - ४६७

- स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारलेले - ३५५

- आर्थिक पॅकेज स्वीकारलेले - २५४

- ९६ प्रकल्पग्रस्तांना वाटलेली जमीन - १०६ हेक्टर

- पर्यायी जमिनीसाठी आणखी हवे - २५ हेक्टर

---------------------------------

* प्रकल्प का रखडला ?

निधीची कमतरता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि धरणग्रस्त संघटनांमधील समन्वय आणि नेमक्या भूमिकेचा अभाव.

---------------------------------

* काय करायला हवे ?

मेअखेरीस घळभरणीचे काम पूर्ण करून येत्या जूनमध्ये धरणात २६.९५ द.ल.घ.मी. पाणी साठविणे आणि २ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सुसंवाद घडवून आणायला हवा. संकलन दुरुस्ती व आर्थिक पॅकेजचे करारनामे तातडीने पूर्ण करणे आणि पुनर्वसनासंदर्भात कोणताही प्रतिसाद न दिलेल्या ८८ प्रकल्पग्रस्तांचेही पुनर्वसन कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.