शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मंडलिक-शेट्टी यांच्या नशिबी ‘विजयी’ रास

By admin | Updated: May 15, 2014 01:05 IST

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर सोळाव्या लोकसभेचा गुलाल उधळण्यासाठी आता काही तासांचाच अवधी राहिला आहे. शुक्रवारी दुपारी बारापर्यंत गुलाल कुणाला लागणार,

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर सोळाव्या लोकसभेचा गुलाल उधळण्यासाठी आता काही तासांचाच अवधी राहिला आहे. शुक्रवारी दुपारी बारापर्यंत गुलाल कुणाला लागणार, हे स्पष्ट होणार असले तरी, आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांच्या नशिबीच विजयाची रास असल्याचे दिसते आहे. त्यामुळे हीच परंपरा यापुढेही कायम राहणार की ती या वेळेला खंडित होणार, हीच आता उत्सुकता आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख चार उमेदवारांची सार्वत्रिक निवडणुकीतील यशाचा लेखाजोखा मांडल्यास त्यामध्ये खासदार मंडलिक व शेट्टी यांची विजयाने जास्त काळ सोबत केल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय जीवनात नशीब हादेखील अत्यंत महत्त्वाचा घटक राहिला आहे. हाच अनुभव संजय मंडलिक यांच्याबाबतीतही आहे. मंडलिक यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी इतरांची गणिते चुकतात; परंतु साधते ते मंडलिक यांचेच, असेच आजपर्यंत घडत आले आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला उघडपणे अथवा पडद्याआड अशा कोणत्या तरी शक्ती धावून येतात आणि जे अशक्य आहे असे वाटते ते बघता-बघता जमून जाते आणि मंडलिक गुलालाचे धनी होऊन जातात. मंडलिक पिता-पुत्रांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा विचार केल्यास खासदार मंडलिक यांनी तब्बल सातवेळा विधानसभेची निवडणूक लढविली. त्यापैकी चारवेळा ते विजयी झाले. तीनवेळा पराभूत झाले. मध्येच एकदा १९६७ला त्यांनी बिद्री-बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली व जीवनराव सावंत यांच्यासारख्या चळवळीतील उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झाले. आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत त्यांनी लोकसभेची निवडणूक चारवेळा लढविली व चारीही वेळा ते विजयी झाले. मंडलिक यांनी विधानसभेची पहिली निवडणूक बंडखोरी करून लढवली. त्यांचा १९७२चा पहिला विजयही बंडखोरी करूनच झाला आहे. संजय मंडलिक आजपर्यंतच्या राजकारणात अपराजित राहिले असून, त्यांनीही काँग्रेसविरुद्ध बंडच केले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांना कोल्हापूरच्या जनतेने विधानसभेला निवडून दिलेले नाही. धनंजय महाडिक यांनी २००४ची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवली; परंतु त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. गत निवडणुकीत त्यांचा राजकीय बळी गेला. पुढे विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीतही त्यांचा निसटता पराभव झाला. आता या निवडणुकीत ते हा पराभवाचा सगळा बॅकलॉग भरून काढून वारंवार ‘हाता’तून निसटणारा विजय खेचून आणतात का, हीच उत्सुकता आहे. हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार खासदार शेट्टी यांनी सगळी मैदाने पहिल्याच लढतीत मारली आहेत. तसा विचार करता त्यांनी एकाच लांगेवर तीन कुस्त्या मारल्या आहेत. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. लोक कुणाला संसदेत पाठवितात आणि कुणाला पुन्हा शिवारात, हे समजण्यासाठी थोडा धीर धरा मित्रांनो....!