शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंडलिक गटाला सोबत घेणार

By admin | Updated: March 26, 2015 00:11 IST

‘गोकुळ’चे राजकारण : राजेश पाटील यांना ‘सत्तारूढ’मधून संधी शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचा मुलगा राजेश पाटील यांना सत्तारूढ आघाडीतून संधी देऊन स्वर्गीय नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाला आपल्यासोबत घेण्याचा आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रयत्न आहे. माजी आमदार पी. एन. पाटील यांचा, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न आहे.संघाच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी या वेळेला सर्वाधिक २५० जणांचे ३८३ अर्ज दाखल झाले आहेत. संघाच्या सत्तेची प्रत्येकालाच हाव सुटल्याचे ते निदर्शक आहे. त्यामुळे सत्तारूढ पॅनेलची रचना करताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सोमवारी (दि. २३) अर्ज दाखल करताना आमदार महाडिक यांनी नरसिंगराव पाटील यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना सोबत घेतले, याचा अर्थ ते त्यांच्या मुलग्यास उमेदवारी देणार हे नक्की मानले जात आहे. राजेश पाटील हे दिवंगत मंडलिक यांचे जावई. त्यांना उमेदवारी दिल्यास मंडलिक गट सत्तारूढ गटाबरोबर येईल, असा त्यांचा होरा आहे. बाबासाहेब चौगले यांची सत्तारूढ गटातील जागा रिक्त झाली आहे. ही जागा चंदगडला देण्याचे घाटत आहे. सत्यजित जाधव यांच्यासाठी पी. एन. पाटील प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांची ताकद तालुक्यापुरतीच मर्यादित आहे. उलट मंडलिक गट म्हणून त्यांचा प्रभाव केव्हाही जास्त आहे. गेल्या निवडणुकीत मंडलिक-नरसिंगराव पाटील यांनी मदत केल्यामुळेच सत्तारूढ आघाडीला गुलाल लागला आहे.माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ हे या निवडणुकीत एकत्र येऊन पॅनेल करणार का, याबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज तरी भरले आहेत; परंतु मुश्रीफ यांनी सत्तारूढ आघाडीस दोन अटी घातल्या आहेत. एक तर अंबरीश घाटगे यांना उमेदवारी देऊ नका व दिली तर माझ्याही कार्यकर्त्याला (रणजित पाटील सोडून) पॅनेलमध्ये संधी द्या; परंतु या दोन्ही गोष्टींना पी. एन. पाटील यांचा विरोध होऊ शकतो. ‘राष्ट्रवादी’ने स्वतंत्र पॅनेल केले, तर मग रणजित पाटील यांचा मतांचा कोटा कमी होतो; परंतु तरीही पाटील हे महाडिक यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्या उमेदवारीस फारसा धोका नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.ताटातलं वाटीत...‘गोकुळ’च्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांना दिले आहेत; परंतु अशी संधी देताना सत्तारूढ आघाडीची कसोटी लागणार असून, त्यांची स्थिती ‘धरलं तर चावतंय...’ अशी झाली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी म्हणजे विद्यमान संचालकांच्या वारसांनाच पॅनेलमध्ये संधी दिली जाणार आहे, असे करणे म्हणजे ‘ताटातलं वाटीत’ अशीच स्थिती असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ संचालकांनी व्यक्त केली आहे.