शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनोगतातून दिली प्रेरणा अन् गुणवंतांनी जिंकली मने

By admin | Updated: August 9, 2015 23:49 IST

सुराज्य फौंडेशन : वारणानगरात आयोजित यूपीएससीतील यशवंतांचा सत्कार समारंभ

आयुब मुल्ला - खोची  टाइमपास करू नका, कष्टाची सतत तयारी ठेवा. भीती सर्वांनाच वाटते, त्याबद्दल न्यूनगंड काढून टाका. निश्चित ध्येयाकडे अभ्यासातून वाटचाल करा. यश मिळते. त्यातून आनंद मिळतो, पण हे यश स्वत:साठी उपयोगता न आणता समाजाच्या विकासासाठी सत्कारणी लावले पाहिजे, असा सल्ला देत अनुभवाचे कथन करीत अडथळे, संघर्षाचा प्रवास उत्स्फूर्तपणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांनी मांडला. त्याला तितक्याच ताकदीने उपस्थितांनी प्रतिसाद देत एक प्रकारचा सलामच केला.निमित्त होतं यूपीएससीतील गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे; पण प्रेरणा मात्र मिळावी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपणही यशवंत होण्याची. वारणानगर येथे सुमारे दोन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत राज्यातील १६ जणांचा सत्कार केला आणि त्यांची मनोगते ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. ज्ञानाची श्रीमंती हीच सर्वश्रेष्ठ आहे. तीच समाजाचा विकास करू शकते. यास बांधील असल्याचे वचनच या सत्कारमूर्तींनी सर्वांसमोर दिले. वैद्यकीय पदवी घेऊनसुद्धा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासनाच्या सेवेत जाण्याचा मनोदय सहाजणांनी व्यक्त केला. यामध्ये संग्राम पाटील (पंढरपूर) म्हणाला, आई-मावशी-काका यांचे मला प्रोत्साहन मिळाले. कौटुंबिक पार्श्वभूमी वैद्यकीय शिक्षणाची असून, कुटुंबातील १४ लोक डॉक्टर आहेत, तरीसुद्धा मी यापासून अलिप्त झालो. समाजाचे आरोग्य सुधारणे महत्त्वाचे मानले. डॉक्टर क्षेत्रात मला चांगले करिअर करता आले असते, परंतु समाजाचा सर्वांगीण विकास हा प्रशासकीय सेवेतून होतो, हाच माझा ध्यास होता. तो मी कृतीतून दाखवून देणार आहे.निसर्ग हिवरे (नंदुरबार) हा बी.टेक. झालेला, परंतु दहावीत असताना त्याचा सत्कार कलेक्टर यांच्या हस्ते झालेला. हाच विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच कष्टातून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगून, माझा आनंद सत्यात उतरल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.मनोगतासाठी उभा राहण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने मनमोकळेपणाने सांगत शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेऊन डॉक्टर झालो. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण हेडाम यांना भेटलो. यशस्वी झालो, पण थोडा उशीर झाला. सुरुवातीला दिशा निश्चित करा, असा सल्ला ज्ञानेश्वर वीर (पुणे) यांनी दिला.एम.बी.बी.एस. होऊनसुद्धा ही परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. समाजासाठी काय करायचे आहे, हे सुमित गरुड (इस्लामपूर) यांनी सांगितले.मिलिंद देबाजे म्हणाले, शरीराचा डॉक्टर असताना मला समाजाचा डॉक्टर होणे पसंत पडले. एम.ए. झालेले (बारलोणी माढा) महेश लोंढे म्हणाले, कष्टावरच तरलो. टाईमपास केला नाही. संपूर्ण शिक्षण मराठीतून घेऊन एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण झालो. चुलत्याच्या किराणा दुकानातील रद्दी वाचनाने माहिती प्रचंड मिळाली. अभ्यास ओझं म्हणून करू नका, एन्जॉय करा. स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग दाखविणारा हा कार्यक्रम जीवनातील समाधानाचे धागेही कसे विणता येतात हा सांगणारा, सर्वांनाच प्रोत्साहन करणारा ठरला. माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष एन. एच. पाटील यांनी सलग आठव्या वर्षी हा कार्यक्रम दिमाखदार पार पाडला.नागपूरची श्वेता पाटील (बी.ई. कॉम्प्युटर) म्हणाली, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे पर्यावरणाची ओळख देणारे विषयच मी अधिक जाणून घेतले. लहानपणापासून त्याची टिप्पणी डायरीत केली. थोरांचा आदर्श समोर ठेवून त्यांची चरित्रे वाचली अन् पे्ररणा मिळाली. मी सहज यशस्वी झाले.पन्हाळ्याचे उपनिबंधक म्हणून काम करीत असलेले राहुल कर्डिले (नेवासा) म्हणाले, बारावीत ६२ टक्के गुण मिळाले. इंजिनिअरिंगमध्ये दोनवेळा नापास झालो, परंतु स्पर्धा परीक्षेत मात्र प्रयत्नातून यश मिळविले. वर्तमानपत्राचे वाचन मला उपयोगी पडले.