शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

गांधीनगर येथील ६ हजार टन कच-याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गांधीनगर, ता. करवीर येथील ६ हजार टन कच-याचे बायो मायनिंगद्वारे व्यवस्थापन करण्याच्या कामास आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गांधीनगर, ता. करवीर येथील ६ हजार टन कच-याचे बायो मायनिंगद्वारे व्यवस्थापन करण्याच्या कामास आमदार ऋतुराज पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.

उद्योजकांची सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर फंड) अंतर्गत रिकार्ट इंडिया, दिल्ली व हिंद ॲग्रो अँड केमिकल्स, कोल्हापूर या कंपनीद्वारे हे कचरा बायो-मायनिंगचे काम केले जाणार आहे. यामध्ये ओला व सुक्या कच-याचे वर्गीकरण केले जाणार आहे. यातील सुका कचरा हा सिमेंट कारखान्याला दिला जाणार असून ओला कचरा स्थानिक शेतक-यांना खत निर्मितीसाठी अथवा जमीन भरावासाठी दिला जाणार आहे. कचरा वर्गीकरण आणि वहन करण्याचे काम कंपनीद्वारेच केले जाणार असून या संपूर्ण कामासाठी १५ लाख रुपये खर्च येणार आहे. ग्रामपंचायतीकडून या प्रकल्पासाठी लागणारी वीज पुरवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर ग्राम पंचायतीचा वर्षानुवर्षे साठलेल्या कच-याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, कंपनीचे प्रतिनिधी सूरज शिंदे, निरंजन ठमके, कौस्तुभ पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

०१०४२०२१ कोल झेडपी ०२

गांधीनगर येथील कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी करण्यात आला. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी उपस्थित होत्या.