शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

माळवींनी पक्षादेशही धुडकावला

By admin | Updated: March 1, 2015 00:37 IST

आज हकालपट्टी शक्य : महाडिक गटाच्या नगरसेवकांकडून मदत

 कोल्हापूर : महापौरपदाचा राजीनामा २८ फेब्रुवारीपर्यंत द्या, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला इशारावजा पक्षादेश महापौर तृप्ती माळवी यांनी शनिवारी धुडकावल्याचे स्पष्ट झाले. शनिवारपर्यंतची मुदत संपल्यानंतरही माळवी यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पक्षातून काढून टाकण्याची औपचारिकता आज, रविवारी पार पाडली जाईल, असे सांगण्यात आले. तृप्ती माळवी यांना महापौरपदावर काम करण्याची सहा महिन्यांकरिता मुदत दिली होती; परंतु त्यांची मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यातच त्या लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. दबाव झुगारुन राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. दस्तुरखुद्द हसन मुश्रीफ यांनी पक्षातून काढून टाकण्याचाही इशारा दिला, पण त्यालाही त्यांनी जुमानले नाही. माजी नगरसेवक सुनील मोदी व सुहास लटोरे यांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे. काटा काढला नाही,तर मोडलाय महापौरांचा राजीनामा होऊ नये म्हणून काहीजण प्रत्यक्ष, तर काही अप्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत. या सर्वांना अनेक घटनांचा राजकीय काटा काढायचा होता. सई खराडे या ताराराणी आघाडी सोडून ‘जनसुराज्य आघाडी’त गेल्या. त्यावेळी हसन मुश्रीफ स्वत: त्यांना भेटायला गेले होते. महाडिकांची मक्तेदारी मोडण्यात मुश्रीफ आघाडीवर होते. तो राग महाडिक यांच्या मनात होताच. दुसरा राग सागर चव्हाण व संभाजी बसुगडे यांच्यातील महापौरपदासाठीच्या संघर्षाबद्दलचा आहे. चव्हाण व बसुगडे यांना सहा-सहा महिन्यांचे महापौर करायचे ठरले होते; परंतु सागर चव्हाण यांनी राजीनामाच दिला नाही. त्यामुळे बसुगडे यांना महापौर होता आले नाही. त्यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांची चव्हाण यांना साथ होती. दोन अपमान महाडिक यांना पचवायला लागले होते. त्याचा आता माळवी यांना मदत करून बदला घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. तिसरा राग हा मृदुला पुरेकर यांना स्थायी समिती सभापती न करण्याचा आहे. पुरेकर यांना स्थायी समिती सभापती किंवा महापौर करण्याचा शब्द दिला होता,त्यामुळे पुरेकर नाहीत, तर मग कोणीही नाही अशी पुरेकर समर्थक नगरसेवकांनी भूमिका घेऊन मुश्रीफ-पाटील यांना शह दिला जात आहे. ‘काटा काढला नाही, तर तो मोडला आहे’ ही प्रा. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. (प्रतिनिधी)