शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आधी गृहपाठ करा, मगच बोला!

By admin | Updated: October 13, 2015 23:50 IST

चंद्रकांतदादांना राजू शेट्टी यांचा सल्ला : एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी गडहिंग्लजला सभा

गडहिंग्लज : केंद्राच्या ‘एफआरपी’ कायद्यात कोणत्याही राज्याला बदल करता येत नाही. प्रसंगी केंद्राने वटहुकुमाद्वारे त्यात दुरुस्ती केली तरी त्यास लोकसभा व राज्यसभेची मंजुरी घ्यावी लागेल. भूमी अधिग्रहणाचा अनुभव लक्षात घेता केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘एफआरपी’ कायद्याचा आधी गृहपाठ करावा आणि मगच बोलावे, असा सल्ला खासदार राजू शेट्टी यांनी दिला.येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश सचिव राजेंद्र गड्यान्नावर, आदींनी आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील व खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, ‘एफआरपी’च्या तुकड्याला शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, असे दाखविण्यासाठी काही कारखान्यांनी वार्षिक सभेत ठराव केले आहेत. त्या बेकायदेशीर ठरावांना कसलाही अर्थ नाही. त्यामुळे हक्काच्या ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’च्या अर्जावर सह्या करा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, दीपक पाटील, नवनीत पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी धनाजी पाटील, अ‍ॅड. अरुण शिंत्रे, संभाजी केसरकर, बाळाराम फडके, विनायक देसाई, सखाराम केसरकर, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. आप्पासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)