शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडे करा

By admin | Updated: May 25, 2016 01:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पाऊस नसला तरी यंत्रणा सज्ज; १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गावपातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चालू वर्र्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सक्षम ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, ‘सर्व यंत्रणांनी आपापल्या विभागांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म आराखडे तत्काळ तयार करावेत. १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत मुख्यालय सोडू नये. जिल्ह्णात सर्वसाधारणपणे १२९ गावे पूरबाधित होतात. या गावांत सर्व विभागांनी नोडल आॅफिसर यांची नेमणूक करावी. शोध व बचाव पथके आणि आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्यात यावे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणारपाटबंधारे विभागाने धरणनिहाय स्वतंत्र नोडल आॅफिसर नेमावा. दैनंदिन पाणीसाठे, विसर्ग, पर्जन्यमान यांचे नियोजन करावे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेही इतकेच महत्त्वाचे आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव या जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थितीत पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने व्हावे, या दृष्टीने या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली. कोल्हापूर पद्धतीच्याबंधाऱ्यांची दुरुस्तीजिल्ह्णात २८२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांची दुरुस्ती होणे महत्त्वाचे असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ आराखडा तयार करून त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी सूचना सैनी यांनी केली. विविध शासकीय योजनांतून बांधलेल्या बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.पर्यायी मार्ग तयार ठेवाआपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध झालेल्या सर्व साहित्याची तपासणी करून मॉकड्रिल घेण्याची सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. तेथील रस्ते पाण्याखाली गेल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांच्या सुटकेसाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.भूस्खलन गावांचा सर्व्हेभूस्खलनाबाबत नियोजन करा. भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या गावांचा सर्व्हे करा. डोंगराळ भागात याबाबतची विशेष खबरदारी घ्या. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवा. यामध्ये गॅसकटर, जेसीबी, पोहणारे यांच्या संपर्कयाद्या तयार कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांकनियंत्रण कक्षाचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक असे : ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६२२९५३ असे आहेत. पोलिस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी १०० तसेच ०२३१-२६६२३३३ हा क्रमांक उपलब्ध आहे.अशी आहेत तालुकानिहाय १२९ पूरबाधित गावे : शिरोळ : ३८, करवीर : २३, हातकणंगले : २०, पन्हाळा : १२, कागल व राधानगरी प्रत्येकी : ११, गगनबावडा ०७, शाहूवाडी : ०५, भुदरगड ०३.