शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडे करा

By admin | Updated: May 25, 2016 01:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पाऊस नसला तरी यंत्रणा सज्ज; १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गावपातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चालू वर्र्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सक्षम ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, ‘सर्व यंत्रणांनी आपापल्या विभागांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म आराखडे तत्काळ तयार करावेत. १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत मुख्यालय सोडू नये. जिल्ह्णात सर्वसाधारणपणे १२९ गावे पूरबाधित होतात. या गावांत सर्व विभागांनी नोडल आॅफिसर यांची नेमणूक करावी. शोध व बचाव पथके आणि आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्यात यावे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणारपाटबंधारे विभागाने धरणनिहाय स्वतंत्र नोडल आॅफिसर नेमावा. दैनंदिन पाणीसाठे, विसर्ग, पर्जन्यमान यांचे नियोजन करावे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेही इतकेच महत्त्वाचे आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव या जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थितीत पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने व्हावे, या दृष्टीने या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली. कोल्हापूर पद्धतीच्याबंधाऱ्यांची दुरुस्तीजिल्ह्णात २८२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांची दुरुस्ती होणे महत्त्वाचे असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ आराखडा तयार करून त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी सूचना सैनी यांनी केली. विविध शासकीय योजनांतून बांधलेल्या बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.पर्यायी मार्ग तयार ठेवाआपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध झालेल्या सर्व साहित्याची तपासणी करून मॉकड्रिल घेण्याची सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. तेथील रस्ते पाण्याखाली गेल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांच्या सुटकेसाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.भूस्खलन गावांचा सर्व्हेभूस्खलनाबाबत नियोजन करा. भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या गावांचा सर्व्हे करा. डोंगराळ भागात याबाबतची विशेष खबरदारी घ्या. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवा. यामध्ये गॅसकटर, जेसीबी, पोहणारे यांच्या संपर्कयाद्या तयार कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांकनियंत्रण कक्षाचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक असे : ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६२२९५३ असे आहेत. पोलिस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी १०० तसेच ०२३१-२६६२३३३ हा क्रमांक उपलब्ध आहे.अशी आहेत तालुकानिहाय १२९ पूरबाधित गावे : शिरोळ : ३८, करवीर : २३, हातकणंगले : २०, पन्हाळा : १२, कागल व राधानगरी प्रत्येकी : ११, गगनबावडा ०७, शाहूवाडी : ०५, भुदरगड ०३.