शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञानाने समृद्ध होईल

By admin | Updated: December 23, 2016 00:52 IST

विवेक सावंत : बुद्धिमान तरुण हीच देशाची ताकद

गडहिंग्लज : भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण आणि गोर-गरीब शाळकरी मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून, हीच खरी देशाची ताकद आहे. या बुद्धिमत्तेला पुरेपूर वाव दिल्यास ज्ञानरचनावादी समाजाची निर्मिती अशक्य नाही. सध्याच्या ज्ञानयुगातील संधी मानून मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञान समृद्ध होईल, असे प्रतिपादन ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘ज्ञानयुगात भारताची झेप : आव्हाने व संधी’ याविषयावर त्यांनी चौथे पुष्प गुंफले. आदिमकालातील शेतीच्या शोधापासून ते २१ व्या शतकातील महासंगणकाच्या निर्मितीपर्यंतच्या देशातील स्थित्यंतराविषयी त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सोदाहरण विवेचन केले. त्यास श्रोत्यांनी विशेष दाद दिली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते.यावेळी सावंत म्हणाले, शेती आणि उद्योगप्रधान व्यवस्थेनंतर माहितीप्रधान व्यवस्थेचा जन्म झाला. माहितीवर प्रक्रिया करून त्यातून संपत्तीची निर्मिती केली जाऊ लागली. त्यातूनच संगणकाचा जन्म झाला. महासंगणकाच्या निर्मितीद्वारे भारताने संपूर्ण विश्वाला आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेची झलक दाखविली आहे.माहितीच्या युगात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गोर-गरिबांचे प्रश्न यावरही उतारा शोधता येईल. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती व प्राथमिकता ठरविण्याची गरज आहे. तसे झाल्यास या प्रश्नांवर आंदोलने करण्याची देखील गरज भासणार नाही. बौद्धिी स्वामित्वाच्या मानधनाचे पैसे आपल्या देशातच राहण्यासाठी अधिकाधिक संशोधनांचे स्वामित्व आपल्याकडे असायला हवे. मात्र, त्यासाठी नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. किंबहुना, त्यास प्रोत्साहन देणाऱ्या नव्या शिक्षण पद्धतीची आज देशाला गरज आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. नगरसेविका अ‍ॅड. नाज खलिफा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजश्री कोले यांनी अतिथी परिचय करून दिला. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साने गुुुरुजीलोकशिक्षणव्याख्यानमाला