शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञानाने समृद्ध होईल

By admin | Updated: December 23, 2016 00:52 IST

विवेक सावंत : बुद्धिमान तरुण हीच देशाची ताकद

गडहिंग्लज : भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण आणि गोर-गरीब शाळकरी मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून, हीच खरी देशाची ताकद आहे. या बुद्धिमत्तेला पुरेपूर वाव दिल्यास ज्ञानरचनावादी समाजाची निर्मिती अशक्य नाही. सध्याच्या ज्ञानयुगातील संधी मानून मुलांना ज्ञानी बनवा, देश ज्ञान समृद्ध होईल, असे प्रतिपादन ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘ज्ञानयुगात भारताची झेप : आव्हाने व संधी’ याविषयावर त्यांनी चौथे पुष्प गुंफले. आदिमकालातील शेतीच्या शोधापासून ते २१ व्या शतकातील महासंगणकाच्या निर्मितीपर्यंतच्या देशातील स्थित्यंतराविषयी त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सोदाहरण विवेचन केले. त्यास श्रोत्यांनी विशेष दाद दिली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते.यावेळी सावंत म्हणाले, शेती आणि उद्योगप्रधान व्यवस्थेनंतर माहितीप्रधान व्यवस्थेचा जन्म झाला. माहितीवर प्रक्रिया करून त्यातून संपत्तीची निर्मिती केली जाऊ लागली. त्यातूनच संगणकाचा जन्म झाला. महासंगणकाच्या निर्मितीद्वारे भारताने संपूर्ण विश्वाला आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेची झलक दाखविली आहे.माहितीच्या युगात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गोर-गरिबांचे प्रश्न यावरही उतारा शोधता येईल. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती व प्राथमिकता ठरविण्याची गरज आहे. तसे झाल्यास या प्रश्नांवर आंदोलने करण्याची देखील गरज भासणार नाही. बौद्धिी स्वामित्वाच्या मानधनाचे पैसे आपल्या देशातच राहण्यासाठी अधिकाधिक संशोधनांचे स्वामित्व आपल्याकडे असायला हवे. मात्र, त्यासाठी नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. किंबहुना, त्यास प्रोत्साहन देणाऱ्या नव्या शिक्षण पद्धतीची आज देशाला गरज आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. नगरसेविका अ‍ॅड. नाज खलिफा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजश्री कोले यांनी अतिथी परिचय करून दिला. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साने गुुुरुजीलोकशिक्षणव्याख्यानमाला