शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

भारत राखीव बटालियनसाठी जागा उपलब्ध करु

By admin | Updated: February 8, 2016 01:11 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन-३ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्णांत १०० एकर भूखंड उपलब्ध न झाल्याने हा बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनाला पाठविला आहे. त्यावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बटालियन कोल्हापूरातचं स्थापन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी प्रस्ताव सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जागेअभावी बटालियन अहमदनगरकडे हलवू नये, आम्ही कोल्हापूर जिल्ह्णांत जागा उपलब्ध करुन घेवू अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या जागेवरील ‘वनसंज्ञा’ रद्द करण्याची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्याने तेथील प्रस्ताव रद्द करून ‘वनसंज्ञा’ लागू नसलेल्या आणि गटनिर्मितीस योग्य जागेचा शोध जिल्ह्यात घेतला असता रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित केली होती. या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई २९ डिसेंबर २०१५ रोजी कोल्हापुरात आले होते. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. परंतु ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध केला. या बैठकीचा निर्णय बिष्णोई यांनी पोलीस महासंचालक दिक्षीत यांना पत्राद्वारे कळविला. त्यावर दिक्षीत यांनी जागे अभावी बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. मुखमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यामुळे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना प्रस्ताव घेवून तात्काळ बोलवून घेतले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव मुखमंत्र्यांना दिला. यावेळी मंत्री पाटील यांनी अहमदनगरला हे बटालियन हलवू नये, आम्ही लवकरचं बटालियनसाठी कोल्हापूरात जागा उपलब्ध करुन घेतो, अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. बटालियनचे कर्मचारी दौंडला रवानाबटालियनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार हे ६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना आज, सोमवारपासून बटालियनचा मुक्काम दौंडला हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बटालियनचे सर्व अधिकारी व कर्मचारी रविवारी सकाळीच दौंडला रवाना झाले. राधानगरी-अकिवाट येथील जागा अपुरी बटालियनसाठी १०० एकर जागेची आवश्यक्ता आहे. राधानगरी व अकिवाट (शिरोळ) येथील ग्रामस्थांनीही ग्रामसभेत हा तळ उभारणीसाठी ६० एकर जागा देण्याचा ठराव केला आहे. ही जागा बटालियनसाठी अपुरी आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढाकार घेणार आहेत.