शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भारत राखीव बटालियनसाठी जागा उपलब्ध करु

By admin | Updated: February 8, 2016 01:11 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन-३ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्णांत १०० एकर भूखंड उपलब्ध न झाल्याने हा बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनाला पाठविला आहे. त्यावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बटालियन कोल्हापूरातचं स्थापन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी प्रस्ताव सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जागेअभावी बटालियन अहमदनगरकडे हलवू नये, आम्ही कोल्हापूर जिल्ह्णांत जागा उपलब्ध करुन घेवू अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या जागेवरील ‘वनसंज्ञा’ रद्द करण्याची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्याने तेथील प्रस्ताव रद्द करून ‘वनसंज्ञा’ लागू नसलेल्या आणि गटनिर्मितीस योग्य जागेचा शोध जिल्ह्यात घेतला असता रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित केली होती. या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई २९ डिसेंबर २०१५ रोजी कोल्हापुरात आले होते. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. परंतु ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध केला. या बैठकीचा निर्णय बिष्णोई यांनी पोलीस महासंचालक दिक्षीत यांना पत्राद्वारे कळविला. त्यावर दिक्षीत यांनी जागे अभावी बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. मुखमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यामुळे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना प्रस्ताव घेवून तात्काळ बोलवून घेतले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव मुखमंत्र्यांना दिला. यावेळी मंत्री पाटील यांनी अहमदनगरला हे बटालियन हलवू नये, आम्ही लवकरचं बटालियनसाठी कोल्हापूरात जागा उपलब्ध करुन घेतो, अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. बटालियनचे कर्मचारी दौंडला रवानाबटालियनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार हे ६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना आज, सोमवारपासून बटालियनचा मुक्काम दौंडला हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बटालियनचे सर्व अधिकारी व कर्मचारी रविवारी सकाळीच दौंडला रवाना झाले. राधानगरी-अकिवाट येथील जागा अपुरी बटालियनसाठी १०० एकर जागेची आवश्यक्ता आहे. राधानगरी व अकिवाट (शिरोळ) येथील ग्रामस्थांनीही ग्रामसभेत हा तळ उभारणीसाठी ६० एकर जागा देण्याचा ठराव केला आहे. ही जागा बटालियनसाठी अपुरी आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढाकार घेणार आहेत.