शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विधानाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची जोपासना

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

सतेज पाटील : उदगाव कल्पद्रुम महामहोत्सवांतर्गत आज रथोत्सव

जयसिंगपूर : २१ व्या शतकात चांगल्या विचारांची गरज असून, हे विचार पोहोचविण्याचे काम धार्मिक कार्यक्रमांतून होत आहे. माणसाने जीवनात मिळवायचे आहे ते फक्त नाव, आनंद व चांगल्या विचारांची देवाण-घेवाण. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सन्मान ठेवावा. विधानाच्या माध्यमातून धर्मगुरूंच्या वाणीतून चांगल्या विचारांची जोपासना होत आहे, असे प्रतिपादन नूतन आमदार सतेज पाटील यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मानस्तंभ द्वादश निमित्त भव्य कल्पद्रुम महामंडल विधान महामहोत्सवाच्या सहाव्या दिवशीच्या कार्यक्रमावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी मुनिश्री १०८ धर्मसागरजी महाराज, मुनिश्री १०८ समतासागरजी महाराज, ऐलक पार्श्वसागरजी महाराज व आर्यिका १०५ माताजी यांचे सान्निध्य लाभले.आ. पाटील पुढे म्हणाले, उदगाव येथील कुंजवन अतिशय क्षेत्राला १५ दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला आलो होतो. यावेळी आपण विजयी झाल्यावर पुन्हा एकदा या क्षेत्राला भेट देण्याचे ठरविले होते, ते आज पूर्ण झाले आहे. महोत्सवाला २५ हजार रुपये देणगी स्वरूपात देत असल्याचे त्यांनी सांगितले.गावातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी पंचामृत अभिषेक व महामंत्राचे जाप्य झाले. पार्श्वनाथ मंदिरातून कुंजवन येथील विधानस्थळी हस्तीवरून सवाद्य मंगलकलश आणण्यात आले. समवशरणावरती आप्पासो मादनाईक यांनी हत्तीवरून पृष्पवृष्टी केली.महोत्सवास आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे, डॉ. श्रीवर्धन पाटील, यशोदा कोळी, शोभा कोळी, संजय पाटील, संजय पाटील-कोथळीकर, नितीन बागे, प्रकाश लठ्ठे, अभिजित मगदूम, संजय चौगुले यांच्यासह श्रावक-श्राविका उपस्थित होते. दरम्यान, आज, शनिवारी भव्य रथोत्सव मिरवणूक निघणार आहे.