शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

कोल्हापूरात सकल मराठा समाजाची बुधवारी महागोलमेज परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 17:20 IST

राज्यातून ५०० प्रतिनिधी येणार : नारायण राणेंसह एकाही राजकीय नेत्याला निमंत्रण नाही...

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १५ : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र व इतर राज्यात लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मुकमोर्चे काढले, पण शासनाने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूरात बुधवारी (१९ एप्रिल रोजी) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापूरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती, त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले. पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विवीध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहीला. त्यासाठी पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.

येत्या बुधवारी कोल्हापूरातील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता ही परिषद होत आहे. या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरवणे आदी नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरु लागले आहे, तर कोपर्डी सारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मराठा समाजाच्या मागण्याबाबत न्यायालयात सुरु असलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस, सचिव राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रशांत पाटील, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उमेश पोवार, विजयराव जाधव, उत्तम कोराणे, विक्रांत पोवार, रणजित जाधव, प्रसाद पाटील, नितीन सासने, जयदिप जाधव, किशोर कदम, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

राज्यातून ५०० लोकांना अमंत्रित

महागोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयातील विविध संघटनेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व सकल मराठा संघाच्या ४ प्रतिनिधींना खास आमंत्रित केले असून अंदाजे ४०० ते ५०० लोक उपस्थित राहतील. परिषदेतून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. परिषदेतूनच १०० जणांची समिती निर्माण करण्यात येणार आहे. ही समिती शासनस्तरावर दबावगट म्हणून राहणार असून न्यायाबाबत पाठपुरावा करणार आहे.

राणेसह कोणाही राजकिय नेत्यांना अमंत्रण नाही

महागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकिय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

परिषदेतील चर्चेचे मुद्दे -

मराठा समाज विद्यार्थी-विद्यार्थ्याचे फि माफी व शैक्षणिक खर्च शासनाकडे मागणी करण्यासाठी ठराव करणे.

मराठा आरक्षणबाबत न्यायालयात आसणारे दावे याबाबत शासनाची भूमीका याबाबत चर्चा करणे. -

शेतीमालास हमीभाव, कर्जमाफीबाबत चर्चा करुन धोरण ठरवणे तसेच शेतकऱ्यांचे विवीध प्रश्नावर चर्चा करणे. -

मराठा समाजात जनजागृती करणे

सोशल मिडीयाची आचारसंहिता एकमताने ठरविणे,

मराठा समाजातील महिला पुले हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको याबाबत चर्चा करुन ठराव करणे. -

कोपर्डीसारख्या अनेक अत्याचार रोखणयसाठी ठोस निर्णय घेऊन ठराव करणे. -

अ‍ॅक्ट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखण्यासाठी चर्चा करुन ठोस निर्णय घेणे.