शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

हातकणंगलेत महाविकास आघाडी सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:25 IST

हातकणंगले: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ...

हातकणंगले: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीने ७, शिवसेना आणि जनसुराज्यने प्रत्येकी ३, सर्वपक्षीय आघाडीने ३ तर आवाडे समर्थक ताराराणी आघाडीने ३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. सर्वात मोठ्या कबनूर ग्रामपंचायतीची सत्ता भाजपा-पी.एम. पाटील स्थानिक आघाडीने काबीज केली.

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तर ८ ग्रामपंचायतींमध्ये सातांतर झाले आहे. सर्वपक्षीय आघाडी तीन ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी झाली आहे.

तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तासगाव, किणी आणि हालोंडी येथे बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. तासगाव सर्व जागा बिनविरोध झाल्या. किणी येथे १० जागा बिनविरोध तर हालोंडीमध्ये ९ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. अपक्षांमुळे किणीच्या ७ जागांची आणि हालोडींच्या ४ जागाची निवडणूक झाली. या दोन्ही गावामध्ये सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार विजयी झाले. किणीमध्ये एकमेव अपक्षाने बाजी मारली.

जनसुराज्यने पाडळी, मनपाडळे, आणि वाठार तर्फ वडगाव या तीन ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. पाडळी आणि वाठार तर्फ वडगावमध्ये सातांतर झाले. मनपाडळेमध्ये सत्ताधारी कायम राहिले.

शिवसेनेने मिणचे, बिरदेववाडी आणि माणगांववाडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. बिरदेववाडीची गेली अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत शिवसेनेने प्रथमच भगव फडकवला आहे. जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मिणचेमध्ये पुन्हा सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या पॅनलच्या सारिका अनिल जाधव यांचा धक्कादायक पराभवाने विजयावर पाणी फिरले.

...............

महाविकास आघाडीचा पॅटर्न

महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत आघाड्या केल्या होत्या. या महाविकास आघाडीने वाठारतर्फे उदगाव, तिळवणी, कुंभोज, दुर्गेवाडी, लाटवडे, नेज, जंगमवाडी, रुई या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.

...............

माणगाव, चंदूरमध्ये आवाडे समर्थक विजयी

आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाचे समर्थक माणगांवचे राजू मगदुम यांनी १७ पैकी १३ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. चंदूरमध्ये आवाडे समर्थक माजी सभापती महेश पाटील यांनी १७ पैकी १४ जागा जिंकून या गावामध्ये सत्तांतर घडवून आणले. तालुक्यातील सर्वात मोठ्या कबनूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपा आणि पंचगंगा साखर कारखाना चेअरमन पी.एम. पाटील यांच्या आघाडीने १७ पैकी १० जागा जिंकून सत्ता कायम राखली. येथे ताराराणी आघाडीने ७ जागा जिंकल्या.