शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

महापुराच्या आपत्तीत महाविकास आघाडी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

नुकसान भरपाई मिळेना शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन चेष्टा लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली ...

नुकसान भरपाई मिळेना शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन चेष्टा

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. घराची पडझड, व्यापारी, उद्योजक यांच्यासह शेतकऱ्यांना अद्याप काहीच नुकसान भरपाई मिळालेली नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यात शेतकऱ्यांना प्रति गुंठा १३२ रुपयांची मदत म्हणजे त्यांची चेष्टा आहे. एकूणच महापुराच्या आपत्तीत शासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रचंड आक्रोश व चीड निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार बैठकीत केली.

मतदारसंघातील ग्रामीण भागात ७६ लाख ८० हजार रुपये, तर शहरी भागात एक कोटी २५ लाख ४० हजार रुपये इतकीच रक्कम आजतागायत पूरग्रस्तांना वाटप केली गेली आहे. उर्वरितांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. २०१९ साली महापूर असताना रोख पाच हजार रुपये आणि नंतर खात्यावर पाच हजार रुपये ग्रामीण व दहा हजार रुपये शहरी अशी तत्काळ मदत दिली होती. शेतकऱ्यांनाही वेळेत व योग्य मदत दिली गेली होती. आता तुटपुंजी मदत देऊन चेष्टा करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.

दरम्यान, यंत्रमाग उद्योगासाठीही केवळ घोषणाबाजी केली. दोन वर्षे उलटली तरी आजतागायत त्याची अंमलबजावणी केली नाही. यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे. तसेच गतवर्षी लॉकडाऊनमुळे समान हप्ते करून वीज बिले स्वीकारली होती. त्याचा मार्च २०२१ पर्यंत कारखानदार व उद्योजकांनी लाभ घेतला. परंतु यंदा मार्चनंतर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्याने उद्योजकांवर तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. थकबाकी वाढल्याने वीज जोडणी तोडण्याची कारवाई सुरू झाली आहे. सरकारने समान हप्ते करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.