शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव मनपा निवडणुकीविरोधात महाराष्ट्राने आमची बाजू मांडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:25 IST

कोल्हापूर: बेळगावमधील मराठी जनतेला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांकडून मिळणारे पाठबळ कमी होत असल्याची खंत व्यक्त करत ...

कोल्हापूर: बेळगावमधील मराठी जनतेला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांकडून मिळणारे पाठबळ कमी होत असल्याची खंत व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीविरोधात महाराष्ट्र सरकारने आमची बाजू मांडावी अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

चुकीच्या पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, पीयूष हावळ, एकीकरण समितीच्या युवाशक्तीचे अध्यक्ष शुभम शेळके, प्रशांत भातकांडे, गीता हालगेकर, मनोहर हालगकेर उपस्थित होते.

सरिता पाटील म्हणाल्या, वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण याबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल लागण्याआधी, कोरोना टास्क फोर्सच्या विरोधानंतरही निवडणूक घेणे, एव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन न जोडणे, याबाबत शेवटपर्यंत मतदार आणि उमेदवारांना अंधारात ठेवणे, हजारो नावे मतदार यादीतून वगळणे, शेजारील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नावे यादीत घुसडणे, मयत नावे यादीत जाणीवपूर्वक ठेवणे अशा विविध कारणांमुळे एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात जाणार आहोत. याला भाजप वगळता अन्य सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे.

शुभम शेळके म्हणाले, घटनाबाह्य पद्धतीने ही निवडणूक घेतली. अनेक उमेदवारांना त्यांच्या घरातील मतेही मिळाली नाहीत असे आकडेवारी सांगते. हे सर्व संशयास्पद आहे. हा संपूर्ण प्रकार लोकशाहीवरील डाग आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नेत्यांनी आमची बाजू मांडली पाहिजे. उलट मराठी माणसाचे पाठबळ कमी झाल्याचे जे चित्र रंगवले जात आहे ते चुकीचे असून केवळ कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे या निवडणुका अशा पद्धतीने घेण्यात आल्या आहेत.

चौकट

मराठी महापौर होऊ न देण्यासाठीच

गेली अनेक वर्षे ज्या बेळगावचा महापौर मराठी होत होता त्याला छेद देण्यासाठीच अशी षडयंत्रे रचली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. २०१३ साली जादा मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले म्हणून एक वर्षानंतर त्यांना शपथ देण्यात आली. २०१९ ला मुदत संपली असताना ती २०२१ ला घेण्यात आली. केवळ कन्नड महापौर झाला पाहिजे यासाठीच कायदा गुंडाळून या निवडणुका घेण्यात येत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.