शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव मनपा निवडणुकीविरोधात महाराष्ट्राने आमची बाजू मांडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:25 IST

कोल्हापूर: बेळगावमधील मराठी जनतेला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांकडून मिळणारे पाठबळ कमी होत असल्याची खंत व्यक्त करत ...

कोल्हापूर: बेळगावमधील मराठी जनतेला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांकडून मिळणारे पाठबळ कमी होत असल्याची खंत व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीविरोधात महाराष्ट्र सरकारने आमची बाजू मांडावी अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

चुकीच्या पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, पीयूष हावळ, एकीकरण समितीच्या युवाशक्तीचे अध्यक्ष शुभम शेळके, प्रशांत भातकांडे, गीता हालगेकर, मनोहर हालगकेर उपस्थित होते.

सरिता पाटील म्हणाल्या, वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण याबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल लागण्याआधी, कोरोना टास्क फोर्सच्या विरोधानंतरही निवडणूक घेणे, एव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन न जोडणे, याबाबत शेवटपर्यंत मतदार आणि उमेदवारांना अंधारात ठेवणे, हजारो नावे मतदार यादीतून वगळणे, शेजारील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नावे यादीत घुसडणे, मयत नावे यादीत जाणीवपूर्वक ठेवणे अशा विविध कारणांमुळे एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात जाणार आहोत. याला भाजप वगळता अन्य सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे.

शुभम शेळके म्हणाले, घटनाबाह्य पद्धतीने ही निवडणूक घेतली. अनेक उमेदवारांना त्यांच्या घरातील मतेही मिळाली नाहीत असे आकडेवारी सांगते. हे सर्व संशयास्पद आहे. हा संपूर्ण प्रकार लोकशाहीवरील डाग आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नेत्यांनी आमची बाजू मांडली पाहिजे. उलट मराठी माणसाचे पाठबळ कमी झाल्याचे जे चित्र रंगवले जात आहे ते चुकीचे असून केवळ कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे या निवडणुका अशा पद्धतीने घेण्यात आल्या आहेत.

चौकट

मराठी महापौर होऊ न देण्यासाठीच

गेली अनेक वर्षे ज्या बेळगावचा महापौर मराठी होत होता त्याला छेद देण्यासाठीच अशी षडयंत्रे रचली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. २०१३ साली जादा मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले म्हणून एक वर्षानंतर त्यांना शपथ देण्यात आली. २०१९ ला मुदत संपली असताना ती २०२१ ला घेण्यात आली. केवळ कन्नड महापौर झाला पाहिजे यासाठीच कायदा गुंडाळून या निवडणुका घेण्यात येत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.