शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

महाराष्ट्र-कर्नाटकने पाण्यासाठी करार करावा : कदम

By admin | Updated: March 13, 2016 23:27 IST

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सीमेलगतच्या एकमेकांच्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला असला तरी, कायमस्वरुपी उन्हाळ्यात असा पुरवठा करण्याबाबत दोन्ही राज्यांनी करार करावा. याबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन याबाबत धोरण ठरवावे, असे मत माजी मदत व पुनर्वसनमंत्री आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमेलगतच्या दुष्काळी गावांना तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळणार आहे, तर कर्नाटकातील गावांना काळमवाडी आणि वारणेतून पाणी दिले जाणार आहे. याबाबत अद्याप कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र दरवर्षी हा विषय उपस्थित होण्यापेक्षा कायमचेच पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात यावे. यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि करार करावा. करार झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्याची शक्यता आहे. दुष्काळी उपाययोजना करताना शासनाला जेवढा खर्च येतो, तो खर्च पाणी योजनांच्या वीज बिलापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने टंचाईतून वीज बिल भरून हा प्रश्न मार्गी लावावा. याच गोष्टीचा विचार करून आघाडी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये पाणी योजना प्रभावीपणे राबवून दुष्काळी भागाला दिलासा दिला होता. सध्याचे शासन दुष्काळी प्रश्नावर गंभीर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातूनच नव्हे, तर सांगली जिल्ह्यातील दुष्काळी लोकही स्थलांतराच्या स्थितीत आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य सरकारने ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)