शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महाराष्ट्र-कर्नाटकने पाण्यासाठी करार करावा : कदम

By admin | Updated: March 13, 2016 23:27 IST

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सीमेलगतच्या एकमेकांच्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला असला तरी, कायमस्वरुपी उन्हाळ्यात असा पुरवठा करण्याबाबत दोन्ही राज्यांनी करार करावा. याबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन याबाबत धोरण ठरवावे, असे मत माजी मदत व पुनर्वसनमंत्री आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगतच्या गावांना दोन्ही राज्यांनी एकमेकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमेलगतच्या दुष्काळी गावांना तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळणार आहे, तर कर्नाटकातील गावांना काळमवाडी आणि वारणेतून पाणी दिले जाणार आहे. याबाबत अद्याप कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र दरवर्षी हा विषय उपस्थित होण्यापेक्षा कायमचेच पाणी वाटपाचे धोरण ठरविण्यात यावे. यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि करार करावा. करार झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्याची शक्यता आहे. दुष्काळी उपाययोजना करताना शासनाला जेवढा खर्च येतो, तो खर्च पाणी योजनांच्या वीज बिलापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने टंचाईतून वीज बिल भरून हा प्रश्न मार्गी लावावा. याच गोष्टीचा विचार करून आघाडी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये पाणी योजना प्रभावीपणे राबवून दुष्काळी भागाला दिलासा दिला होता. सध्याचे शासन दुष्काळी प्रश्नावर गंभीर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातूनच नव्हे, तर सांगली जिल्ह्यातील दुष्काळी लोकही स्थलांतराच्या स्थितीत आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य सरकारने ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)