शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

महाराष्ट्र सरकार असंवेदनशील :जोगेंद्र कवाडे

By admin | Updated: April 23, 2017 17:04 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी हे स्वप्नच

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे रविवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकारवर कोणताच परिणाम होत नाही. या शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी सन्मानपूर्वक जगला पाहिजे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन करण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.

सर्व उत्पादनांची किंमत हा मालक ठरवतो; पण शेतमालाची किंमत हा शेतकरी ठरवू शकत नाही; त्यामुळे या शेतकऱ्याला परावलंबी हे शासनानेच बनविले असल्याचीही त्यांनी टीका केली.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे बनविले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही.

आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. दलितांवर अत्याचार वाढले महाराष्ट्रात दलित, बौद्धांवर अत्याचार वाढल्याची भयानक परिस्थिती समोर येत आहे.

खैरलांजी प्रकरणानंतर हे अत्याचार कमी होतील अशी अपेक्षा होती; पण या अत्याचारांच्या प्रमाणात सुमारे ४४ टक्के वाढ झाल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील हे भाजपचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली.

शिक्षण व्यवस्था ‘फॉल्टी’ दलित समाजाची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय त्यांना आरक्षणाचा लाभ उठविता येणार नाही. त्यामुळे प्रथम देशातील ‘फॉल्टी’ असणारी शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. सर्वांना समान शिक्षण पद्धतीचा सरकारने अवलंब करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.