शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकार असंवेदनशील :जोगेंद्र कवाडे

By admin | Updated: April 23, 2017 17:04 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी हे स्वप्नच

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे रविवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकारवर कोणताच परिणाम होत नाही. या शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी सन्मानपूर्वक जगला पाहिजे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन करण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.

सर्व उत्पादनांची किंमत हा मालक ठरवतो; पण शेतमालाची किंमत हा शेतकरी ठरवू शकत नाही; त्यामुळे या शेतकऱ्याला परावलंबी हे शासनानेच बनविले असल्याचीही त्यांनी टीका केली.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे बनविले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही.

आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. दलितांवर अत्याचार वाढले महाराष्ट्रात दलित, बौद्धांवर अत्याचार वाढल्याची भयानक परिस्थिती समोर येत आहे.

खैरलांजी प्रकरणानंतर हे अत्याचार कमी होतील अशी अपेक्षा होती; पण या अत्याचारांच्या प्रमाणात सुमारे ४४ टक्के वाढ झाल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील हे भाजपचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली.

शिक्षण व्यवस्था ‘फॉल्टी’ दलित समाजाची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय त्यांना आरक्षणाचा लाभ उठविता येणार नाही. त्यामुळे प्रथम देशातील ‘फॉल्टी’ असणारी शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. सर्वांना समान शिक्षण पद्धतीचा सरकारने अवलंब करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.