शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकार असंवेदनशील :जोगेंद्र कवाडे

By admin | Updated: April 23, 2017 17:04 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी हे स्वप्नच

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे रविवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकारवर कोणताच परिणाम होत नाही. या शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी सन्मानपूर्वक जगला पाहिजे. त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन करण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.

सर्व उत्पादनांची किंमत हा मालक ठरवतो; पण शेतमालाची किंमत हा शेतकरी ठरवू शकत नाही; त्यामुळे या शेतकऱ्याला परावलंबी हे शासनानेच बनविले असल्याचीही त्यांनी टीका केली.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे बनविले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही.

आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. दलितांवर अत्याचार वाढले महाराष्ट्रात दलित, बौद्धांवर अत्याचार वाढल्याची भयानक परिस्थिती समोर येत आहे.

खैरलांजी प्रकरणानंतर हे अत्याचार कमी होतील अशी अपेक्षा होती; पण या अत्याचारांच्या प्रमाणात सुमारे ४४ टक्के वाढ झाल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील हे भाजपचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली.

शिक्षण व्यवस्था ‘फॉल्टी’ दलित समाजाची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय त्यांना आरक्षणाचा लाभ उठविता येणार नाही. त्यामुळे प्रथम देशातील ‘फॉल्टी’ असणारी शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. सर्वांना समान शिक्षण पद्धतीचा सरकारने अवलंब करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.