शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मराठा समाजाची बुधवारी महागोलमेज

By admin | Updated: April 16, 2017 01:01 IST

मराठा आरक्षण प्रश्न : आंदोलनाची दिशा ठरणार; असंख्य मोर्चे निघूनही शासनाने दुर्लक्ष केल्याची टीका

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मूक मोर्चे काढले; पण शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि. १९) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही परिषद येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होईल व ती दिवसभर चालेल. क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घेऊन तिचे आयोजन केले आहे. त्याचदिवशी दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले; पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विविध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहिला. त्यामुळे मोर्चानंतर पुढे काय अशी विचारणा राज्यभरातून होत होती. त्याचा म्हणून पुढे कसे जायचे याचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठीच पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरू लागले आहे, तर कोपर्डीसारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत न्यायालयात सुरूअसलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सचिव राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रशांत पाटील, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उमेश पोवार, विजयराव जाधव, उत्तम कोराणे, विक्रांत पोवार, रणजित जाधव, प्रसाद पाटील, नितीन सासने, जयदीप जाधव, किशोर कदम, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) महागोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्णातील विविध संघटनेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व सकल मराठा संघाच्या चार प्रतिनिधींना खास निमंत्रित केले असून, ५०० लोक उपस्थित राहतील. परिषदेतूनच १०० जणांची समिती निर्माण करण्यात येणार आहे. ही समिती शासन स्तरावर दबावगट म्हणून राहणार असून, न्यायाबाबत पाठपुरावा करणार आहे. परिषदेतील चर्चेचे मुद्दे१ मराठा समाज विद्यार्थ्यांची फी माफी व शैक्षणिक खर्च शासनाकडे मागणी करण्यासाठी ठराव करणे. २ मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात असणाऱ्या दाव्यात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी शासनावर दबाव टाकणे व त्यांना पूरक माहिती देण्यासाठी खास गट निर्माण करणे.३ शेतीमालास हमीभाव, कर्जमाफीबाबत चर्चा करून धोरण ठरविणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे.४ मराठा समाजात प्रबोधनाचा कृती कार्यक्रम ठरविणे. लग्न समारंभ व मृत्यूनंतरच्या धार्मिक समारंभात जी उधळपट्टी केली जाते त्याबाबत जनजागृती करणे.५ सोशल मीडियाची आचारसंहिता एकमताने ठरविणे.६ मराठा समाजातील महिला, मुली हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको याबाबत चर्चा करून ठराव करणे.७ कोपर्डीसारखे अनेक अत्याचार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन ठराव करणे.८ अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखण्यासाठी चर्चा करून ठोस निर्णय घेणे. असे खोटे गुन्हे जिथे दाखल होतील, तिथे समाजातर्फे नामांकित वकील देण्याबाबत विचार करणे.नेतृत्व ठरणार..या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरविला जाणार आहे. सकल मराठा समाजातर्फे जे राज्यभर मोर्चे निघाले, त्यास कुणाचे नेतृत्व नव्हते. ती समाजाने व्यक्त केलेली उस्फूर्त प्रतिक्रिया होती. परंतू असा नेतृत्वहीन समाज पुढे नेणे शक्य नाही. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या नेतृत्वाखाली आकार घेईल याचा महत्वाचा निर्णय या परिषदेत घेतला जाणार आहे. त्यासाठी एक राज्यव्यापी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.राणेंसह कुणालाही निमंत्रण नाहीमहागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण अभ्यास समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.