शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

मराठा समाजाची बुधवारी महागोलमेज

By admin | Updated: April 16, 2017 01:01 IST

मराठा आरक्षण प्रश्न : आंदोलनाची दिशा ठरणार; असंख्य मोर्चे निघूनही शासनाने दुर्लक्ष केल्याची टीका

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मूक मोर्चे काढले; पण शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि. १९) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही परिषद येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होईल व ती दिवसभर चालेल. क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घेऊन तिचे आयोजन केले आहे. त्याचदिवशी दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले; पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विविध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहिला. त्यामुळे मोर्चानंतर पुढे काय अशी विचारणा राज्यभरातून होत होती. त्याचा म्हणून पुढे कसे जायचे याचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठीच पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरू लागले आहे, तर कोपर्डीसारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत न्यायालयात सुरूअसलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सचिव राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रशांत पाटील, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उमेश पोवार, विजयराव जाधव, उत्तम कोराणे, विक्रांत पोवार, रणजित जाधव, प्रसाद पाटील, नितीन सासने, जयदीप जाधव, किशोर कदम, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) महागोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्णातील विविध संघटनेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व सकल मराठा संघाच्या चार प्रतिनिधींना खास निमंत्रित केले असून, ५०० लोक उपस्थित राहतील. परिषदेतूनच १०० जणांची समिती निर्माण करण्यात येणार आहे. ही समिती शासन स्तरावर दबावगट म्हणून राहणार असून, न्यायाबाबत पाठपुरावा करणार आहे. परिषदेतील चर्चेचे मुद्दे१ मराठा समाज विद्यार्थ्यांची फी माफी व शैक्षणिक खर्च शासनाकडे मागणी करण्यासाठी ठराव करणे. २ मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात असणाऱ्या दाव्यात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी शासनावर दबाव टाकणे व त्यांना पूरक माहिती देण्यासाठी खास गट निर्माण करणे.३ शेतीमालास हमीभाव, कर्जमाफीबाबत चर्चा करून धोरण ठरविणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे.४ मराठा समाजात प्रबोधनाचा कृती कार्यक्रम ठरविणे. लग्न समारंभ व मृत्यूनंतरच्या धार्मिक समारंभात जी उधळपट्टी केली जाते त्याबाबत जनजागृती करणे.५ सोशल मीडियाची आचारसंहिता एकमताने ठरविणे.६ मराठा समाजातील महिला, मुली हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा मागणी नको याबाबत चर्चा करून ठराव करणे.७ कोपर्डीसारखे अनेक अत्याचार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन ठराव करणे.८ अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखण्यासाठी चर्चा करून ठोस निर्णय घेणे. असे खोटे गुन्हे जिथे दाखल होतील, तिथे समाजातर्फे नामांकित वकील देण्याबाबत विचार करणे.नेतृत्व ठरणार..या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरविला जाणार आहे. सकल मराठा समाजातर्फे जे राज्यभर मोर्चे निघाले, त्यास कुणाचे नेतृत्व नव्हते. ती समाजाने व्यक्त केलेली उस्फूर्त प्रतिक्रिया होती. परंतू असा नेतृत्वहीन समाज पुढे नेणे शक्य नाही. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या नेतृत्वाखाली आकार घेईल याचा महत्वाचा निर्णय या परिषदेत घेतला जाणार आहे. त्यासाठी एक राज्यव्यापी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.राणेंसह कुणालाही निमंत्रण नाहीमहागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण अभ्यास समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.