शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

महाडिक-सतेज संघर्षात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त!-- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:32 IST

सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात घालून सोडविले पाहिजेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाडिक - सतेज पाटील राजकीय संघर्षात अनेकांचे ...

ठळक मुद्देकटूता टाळत विधायक कार्यासाठी ताकद खर्च करूयानिकोप स्पर्धा करून शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी संचालक मंडळाने कार्यरत राहावे ऊस गाळपाचे नियोजन करू तसेच इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न

सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात घालून सोडविले पाहिजेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाडिक - सतेज पाटील राजकीय संघर्षात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. बदलत्या राजकारणात हे सर्व विसरून तरुणांची शक्ती विधायक कार्यात वापरूया पिढ्यान्पिढ्या वैरत्व नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रागंणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते.चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, देशात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, उत्पन्नाचा बहुतांशी हिस्सा हा छोट्या सोसायटीपासून ते ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आडवा-आडवीत, जिरवा-जिरवीत अनाठायी खर्च होतो. मात्र, संघर्ष, कटूता टाळत ही ताकद विधायक कार्यासाठी खर्च करूया आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावूया, असेही ते म्हणाले.

मुश्रीफम्हणाले, ‘बिद्री’च्या निवडणुकीत शेतकरी सभासदांना ऊस दर, गाळप क्षमता वाढविणे याबरोबरच तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता आणण्याचा दिलेला शब्द नवनिर्वाचित संचालकांनी पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावे. त्याच बरोबर पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

आमदार हाळवणकर म्हणाले, ‘बिद्री’त सक्षम नेतृत्व देत चांगल्या कारभाराला पाठबळ देण्यासाठी भाजपने राष्टÑवादीला साथ दिली; मात्र हा पैरा फेडणार असल्याचे ते म्हणतात. कारखाना हा राजकारण म्हणून न पाहता शेतकºयांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून पाहिले. निकोप स्पर्धा करून शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी संचालक मंडळाने कार्यरत राहावे .

प्रास्ताविकात नूतन अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, या विजयाचे श्रेय व्यासपीठावरील नेतेमंडळींचे असून, सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ११ महिन्यांत कारखान्याचा विस्तार करीत सध्या गाळप क्षमता ७५०० हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवू आणि ३१ मार्चपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपाचे नियोजन करू तसेच इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून अपात्र सभासदांना पात्र करून साखर देण्याचा प्रयत्न येत्या काही महिन्यांत केला जाईल, असे ते म्हणाले.यावेळी माजी आमदार नामदेवराव भोईटे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, विलास कांबळे, राहुल देसाई, धैर्यशील पाटील, नाथाजी पाटील, युवराज पाटील, मनोज फराकटे, भूषण पाटील, पंडितराव केणे, विवेक गवळी संचालक, पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.अन् ‘दादा’ भडकले...बिद्री साखर कारखान्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विजयी मेळाव्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आगमन झाले आणि ते थेट कार्यक्रमस्थळी गेले. मात्र, तेथे कोणीच नव्हते. त्यानंतर तेथून त्यांना कारखाना गेस्ट हाऊसमध्ये आणण्यात आले. तेथेही कोणीच नसल्याने ते जाम भडकले. त्यातच नूतन उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे तेथे आले. त्यांना पाहताच त्यांचा पारा चढला आणि ते म्हणाले, खोराटे तुम्ही आम्हाला वाट पाहायला लावता. तुम्ही आम्हाला वाट पाहायला लावणार असाल तर जनतेचे काय कल्याण करणार! असे म्हणताच सर्वांची भंबेरी उडाली.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री