शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

‘महाडिक, पी. एन. यांच्यासह १८ माजी संचालकांनी मांडली बाजू

By admin | Updated: October 1, 2015 00:58 IST

जिल्हा बँक गैरव्यवहार : चौदाजणांनी केले लेखी म्हणणे सादर; पुढील सुनावणी १४ आॅक्टोबरला

कोल्हापूर : आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, सतेज पाटील यांच्यासह १८ माजी संचालकांच्यावतीने वकिलांनी बुधवारी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर आपली बाजू मांडली. मंत्रालयात झालेल्या सुनावणीत काही संचालकांनी लेखी म्हणणे सादर केले, तर काहींचे म्हणणे सादर होऊ शकले नाही. याबाबत पुढील सुनावणी १४ आॅक्टोबरला होणार आहे. जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने सहकार मंत्र्यांकडे याबाबत सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते; पण गेले तीन महिने सुनावणीची प्रक्रिया ठप्प होती. अखेर सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे बुधवारी सुनावणी झाली. त्यामध्ये आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील, पी. एन. पाटील, अरुण नरके, संदीप नरके, एस. आर. पाटील, अमर पाटील, आदी १८ माजी संचालकांच्यावतीने अ‍ॅड. लुईस शहा यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर बाजू मांडली. टी. आर. पाटील यांच्यासह चौदा संचालकांच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले. (प्रतिनिधी)बाराजण नोटिसाविनाचसहकार मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या; पण माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह बाराजणांना नोटिसाच मिळाल्या नसल्याने त्यांचे म्हणणे सादर होऊ शकले नाही. बुधवारीच सहकार मंत्र्यांनी सर्वांना नोटिसा काढून त्या लागू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना दिले. शहा यांचा युक्तिवादचौकशी अधिकाऱ्यांनी संबंधित संचालकांच्या माघारी बॅँकेतून पुरावे गोळा केले. आॅडिट रिपोर्टच्या अगोदर पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी न करता १९९८ पासूनच्या कामकाजाची चौकशी करण्यात आली. ज्या २८ थकबाकीदार संस्थांच्या कर्जासाठी संबंधित संचालकांना जबाबदार धरण्यात आले. त्या संस्था थकीत असल्या तरी त्यांची वसुलीची प्रक्रिया थांबलेली नाही. कर्जाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. थकीत रक्कम वसूल होणारच नाही, असे निष्पन्न झाले नसल्याने संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई करणे उचित नाही. चौकशीचा अहवाल साठ दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असताना सचिन रावळ यांनी ३१ जून २०१४ ला चौकशीचे कामकाज पूर्ण केले आणि २३ जानेवारी २०१५ ला अहवाल सादर केला. ही प्रक्रियाच चुकीची असल्याचे अ‍ॅड. लईस शहा यांनी युक्तिवादात दावा केला. माझ्याकडील चौदा संचालकांचे लेखी म्हणणे सहकार मंत्र्यांकडे सादर केले. याबाबत १४ आॅक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. - शिवाजीराव चव्हाण, वकील