शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा

By admin | Updated: April 14, 2017 23:02 IST

राजू शेट्टी आक्रमक : ३३९ गावांमधून निघणार रॅली

कोल्हापूर : भाजपसोबत सत्तेत असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ४ मे रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्याआधी पाच दिवस स्वाभिमानीचे २०० युवक जिल्ह्यातील ३३९ गावांमधून रॅली काढणार असून, या पाच दिवशी रात्री शेट्टी यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून जाणार आहे. राजू शेट्टी जरी सत्तेत असले तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेत भाजप सरकारलाही टीकेचे लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी त्यांनी आता प्रत्यक्ष भूमिका घेतली आहे. कर्जमुक्ती बरोबरच, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा, शेतीपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, स्वामिनाथन कमिटीचा अहवाल त्वरित स्वीकारा यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून ३३९ गावांमधून ११५० किलोमीटरची ही रॅली काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि रविकांत तूपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे हे या सभांना उपस्थित राहणार आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि अन्य मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; परंतु अजूनही शासनाने याबाबतीत निर्णय घेतलेला नाही. आम्ही जरी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांची बाजू आम्हाला घ्यावीच लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे आणि तो ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलनेच होईल. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना