शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा

By admin | Updated: April 14, 2017 23:02 IST

राजू शेट्टी आक्रमक : ३३९ गावांमधून निघणार रॅली

कोल्हापूर : भाजपसोबत सत्तेत असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ४ मे रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्याआधी पाच दिवस स्वाभिमानीचे २०० युवक जिल्ह्यातील ३३९ गावांमधून रॅली काढणार असून, या पाच दिवशी रात्री शेट्टी यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून जाणार आहे. राजू शेट्टी जरी सत्तेत असले तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेत भाजप सरकारलाही टीकेचे लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी त्यांनी आता प्रत्यक्ष भूमिका घेतली आहे. कर्जमुक्ती बरोबरच, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा, शेतीपंपाला २४ तास वीजपुरवठा करावा, मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, स्वामिनाथन कमिटीचा अहवाल त्वरित स्वीकारा यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतून ३३९ गावांमधून ११५० किलोमीटरची ही रॅली काढण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि रविकांत तूपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे हे या सभांना उपस्थित राहणार आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि अन्य मागण्यांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; परंतु अजूनही शासनाने याबाबतीत निर्णय घेतलेला नाही. आम्ही जरी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांची बाजू आम्हाला घ्यावीच लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे आणि तो ‘स्वाभिमानी’च्या स्टाईलनेच होईल. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना