शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
5
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
6
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
7
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
8
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
11
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
12
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
13
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
14
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
15
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
16
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
17
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
18
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
19
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

मदनभाऊही लवकरच काँग्रेसमध्ये परत येतील !

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

पतंगराव कदम : राज्यात पुन्हा जिल्ह्याचा दबदबा निर्माण करण्याचा काँग्रेसच्या मेळाव्यात निर्धार

सांगली : वसंतदादांच्या काळात संपूर्ण राज्यात जिल्ह्याचा वेगळा दबदबा होता. वसंतदादांच्याच कृतीचा आणि विचारांचा वारसा घेऊन राज्यात पुन्हा जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला जाईल. बाजार समितीत काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील, असे प्रतिपादन आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी ‘पर्दाफाश’ मेळाव्याचे आयोजन मार्केट यार्डातील सभागृहात केले होते. यावेळी कदम बोलत होते. ते म्हणाले की, सरकार कोणत्या दिशेने जात आहे, याची कल्पना आता सर्वांनाच आलेली आहे. लोकांच्या मनातील खदखदणाऱ्या गोष्टीला फुंकर घालतानाच, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आता पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. वसंतदादांच्या काळात राज्यात जिल्ह्याचा वेगळाच दबदबा होता. काँग्रेसला ते पूर्ववैभव प्राप्त होण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. परिवर्तनाचे वारे आता जिल्ह्यात वाहत आहे. सांगली बाजार समिती ताब्यात आली आहे. वास्तविक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घोटाळा झाला. आमच्याच माणसांनी आम्हाला अचानक दगा दिला. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला नियोजन करावे लागले. पक्षाचे निरीक्षक रामहरी रुपनवर म्हणाले की, सध्या सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य माणसांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या नागरिकांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे. खाऊनही ३0 कोटी शिल्लकबाजार समितीबाबत कदम म्हणाले की, यापुढे बाजार समितीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जाईल. इतक्या वर्षांत अनेकांनी खाऊनही समितीचे ३0 कोटी शिल्लक आहेत, हे विशेषच! समितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता आहे. व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील. मुन्ना कुरणेंची घरवापसीविधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गेलेले व भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले माजी नगरसेवक मुन्ना कुरणे पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. त्यांना पक्षात आणण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून प्रयत्न चालू होते. पृथ्वीराज पाटील, पतंगराव कदम यांनी यासाठी प्रयत्न केले. कुरणे यांनी सभेत पक्षाच्या काही नेत्यांमुळे सच्चा कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची टीका केली. पतंगरावांनीही ही गोष्ट मान्य करून, कुरणे यांची जाहीररीत्या माफी मागितली. पक्षात यापुढे कुरणे यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.