शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

मदनभाऊही लवकरच काँग्रेसमध्ये परत येतील !

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

पतंगराव कदम : राज्यात पुन्हा जिल्ह्याचा दबदबा निर्माण करण्याचा काँग्रेसच्या मेळाव्यात निर्धार

सांगली : वसंतदादांच्या काळात संपूर्ण राज्यात जिल्ह्याचा वेगळा दबदबा होता. वसंतदादांच्याच कृतीचा आणि विचारांचा वारसा घेऊन राज्यात पुन्हा जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला जाईल. बाजार समितीत काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील, असे प्रतिपादन आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी ‘पर्दाफाश’ मेळाव्याचे आयोजन मार्केट यार्डातील सभागृहात केले होते. यावेळी कदम बोलत होते. ते म्हणाले की, सरकार कोणत्या दिशेने जात आहे, याची कल्पना आता सर्वांनाच आलेली आहे. लोकांच्या मनातील खदखदणाऱ्या गोष्टीला फुंकर घालतानाच, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आता पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. वसंतदादांच्या काळात राज्यात जिल्ह्याचा वेगळाच दबदबा होता. काँग्रेसला ते पूर्ववैभव प्राप्त होण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. परिवर्तनाचे वारे आता जिल्ह्यात वाहत आहे. सांगली बाजार समिती ताब्यात आली आहे. वास्तविक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घोटाळा झाला. आमच्याच माणसांनी आम्हाला अचानक दगा दिला. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला नियोजन करावे लागले. पक्षाचे निरीक्षक रामहरी रुपनवर म्हणाले की, सध्या सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य माणसांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या नागरिकांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे. खाऊनही ३0 कोटी शिल्लकबाजार समितीबाबत कदम म्हणाले की, यापुढे बाजार समितीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जाईल. इतक्या वर्षांत अनेकांनी खाऊनही समितीचे ३0 कोटी शिल्लक आहेत, हे विशेषच! समितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता आहे. व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील. मुन्ना कुरणेंची घरवापसीविधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गेलेले व भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले माजी नगरसेवक मुन्ना कुरणे पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. त्यांना पक्षात आणण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून प्रयत्न चालू होते. पृथ्वीराज पाटील, पतंगराव कदम यांनी यासाठी प्रयत्न केले. कुरणे यांनी सभेत पक्षाच्या काही नेत्यांमुळे सच्चा कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची टीका केली. पतंगरावांनीही ही गोष्ट मान्य करून, कुरणे यांची जाहीररीत्या माफी मागितली. पक्षात यापुढे कुरणे यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.