शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

म. गांधींजींच्या विचारांची आजही गरज : संकेत मुनोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST

कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि ...

कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरवाद्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत गांधींचे विचार अडसर ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष व प्राणघातक हल्ले होत आहेत. गांधींचा चरखा हे अहिंसेचे प्रतीक असून, रचनात्मक कार्याचा भाग आहे. जात, धर्म, पंथ, प्रदेश, भेद यासारख्या विभागणीला आव्हान देण्याचे काम आजच्या काळात गांधींची प्रेरणा व समग्र कार्यच करू शकतो, असे प्रतिपादन गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी केले.

येथील कृष्णा-पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार-प्रचार समितीच्या वतीने सर्वोदय दिनानिमित्त गांधी विचार कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी संजीव साने होते.

सकाळी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मुनोत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोलाचे संस्थापक ललित बाबर, संयोजन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन दानवाडे, लेखिका नीलम माणगावे, राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांची भाषणे झाली. दुसऱ्या सत्रात शाहीर बाळासाहेब नाईक यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, सुंदर देसाई, प्राचार्य व्ही.डी. माने, सुंदर देसाई, गीता गुरव, मेघना शेटे, अरुण चव्हाण, एस.एस. सावंत, हसन देसाई, आबा कांबळे, वैभव उगळे, जयपाल बलवान, प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. राजू निर्मळे, नारायण कौलापुरे आदींची उपस्थिती होती. महेश घोटणे यांनी आभार मानले.

फोटो - १३०२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील कृष्णा- पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार- प्रचार समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, आबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.