शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

म. गांधींजींच्या विचारांची आजही गरज : संकेत मुनोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST

कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि ...

कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरवाद्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत गांधींचे विचार अडसर ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष व प्राणघातक हल्ले होत आहेत. गांधींचा चरखा हे अहिंसेचे प्रतीक असून, रचनात्मक कार्याचा भाग आहे. जात, धर्म, पंथ, प्रदेश, भेद यासारख्या विभागणीला आव्हान देण्याचे काम आजच्या काळात गांधींची प्रेरणा व समग्र कार्यच करू शकतो, असे प्रतिपादन गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी केले.

येथील कृष्णा-पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार-प्रचार समितीच्या वतीने सर्वोदय दिनानिमित्त गांधी विचार कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी संजीव साने होते.

सकाळी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मुनोत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोलाचे संस्थापक ललित बाबर, संयोजन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन दानवाडे, लेखिका नीलम माणगावे, राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांची भाषणे झाली. दुसऱ्या सत्रात शाहीर बाळासाहेब नाईक यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, सुंदर देसाई, प्राचार्य व्ही.डी. माने, सुंदर देसाई, गीता गुरव, मेघना शेटे, अरुण चव्हाण, एस.एस. सावंत, हसन देसाई, आबा कांबळे, वैभव उगळे, जयपाल बलवान, प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. राजू निर्मळे, नारायण कौलापुरे आदींची उपस्थिती होती. महेश घोटणे यांनी आभार मानले.

फोटो - १३०२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील कृष्णा- पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार- प्रचार समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, आबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.