शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

सत्तेसाठी निष्ठा खुंटीवर

By admin | Updated: April 26, 2015 00:49 IST

सोयीचे राजकारण : सत्तेच्या वाटणीत कार्यकर्ते वाऱ्यावर

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षनिष्ठा व आपली तत्त्वे खुंटीला ठेवून सोयीचे राजकारण केले. बॅँकेत लागलेला डाग पुसण्यासाठी की केलेल्या कारभारावर पांघरूण घालण्यासाठी नेत्यांनी अशी मिटवामिटवीची खेळी केली. याबाबत संभ्रमावस्था असून, सत्तेच्या वाटणीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बॅँकेवर प्रशासक आले. विनातारण कर्जवाटप, वारेमाप खर्च यामुळे बॅँक ११/१ सेक्शनमध्ये गेल्याने बॅँकेबरोबर सभासदांचे मोठे नुकसान झाले. लाभांश न मिळाल्याने संस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासकांनी बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही बॅँक पूर्णपणे बाहेर आलेली नाही. तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागली. ज्यांच्या कारभारामुळे बॅँक अडचणीत आली, तीच मंडळी पुन्हा सत्तेसाठी पुढे आले. आजपर्यंत नेत्यांनी आपल्या भोवतीच राजकारण केल्याने ते कार्यकर्त्यांना संधी देऊच शकत नाहीत. या मंडळींबद्दल कमालीची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळ नकोच, असा ठराव सभासदांनी केला होता. अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने सभासदांसमोर मते मागायला जायचे? असा प्रश्न सत्तारूढ गटाच्या नेत्यांसमोर होता. निवडणूक झालीच तर ती दोन्ही काँग्रेसमध्ये होणार आणि काँग्रेस अनियमित कामाबद्दल आपले वस्त्रहरण करणार, हे माहिती असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच सर्व मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत तडजोडीची भूमिका घेतली. जिल्हा बॅँकेची सत्ता सोडायची नाही, म्हणून राष्ट्रवादीने ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला बाय दिला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या माध्यमातून नवीन मोट बांधली होती. परंतु, एकाच निवडणुकीत त्यांनी तलवार म्यान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संजय मंडलिक यांनी संधी मिळते म्हटल्यावर कोणाचाही विचार न करता उडी मारली. आमदार चंद्रदीप नरके यांनीही ऐनवेळी रिंगणातून माघार घेऊन कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का दिला. अशा या नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत असून, याचे पडसाद आगामी सर्वच निवडणुकीत दिसणार, हे मात्र निश्चित आहे.