शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

कोल्हापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: February 27, 2016 01:02 IST

महापालिका : पंचगंगेची पातळी कमी झाल्याचा परिणाम

कोल्हापूर : शहरात पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडून उपसा कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राधानगरी धरणातून पुरेसे पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती जलसंपदा विभागाला करण्यात आल्याचे महानगरपालिका सूत्रांनी सांगितले. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमालीची कमी झाली आहे. शहराला दैनंदिन लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी बालिंगा तसेच शिंगणापूर येथील बंधाऱ्याजवळून उपसा केला जातो; परंतु या बंधाऱ्याजवळच पाणीसाठा कमी झाला असल्याने उपसाही कमी होत आहे. त्यामुळे शहराला आवश्यक असलेला पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून शुक्रवारी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने जलसंपदा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती केली आहे. शनिवारपर्यंत पाणी नदीपात्रात टाकले जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दुष्काळी योजना ६२१, सुरू सहाच कोल्हापूर : जिल्ह्याचा जूनअखेरचा पाणीटंचाईचा आराखडा तयार आहे. आराखड्यात ६२१ उपाययोजनांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ सहा कामे सुरू आहेत. प्रत्यक्षात वाड्या-वस्त्यांंमध्ये पाणीटंचाई भीषण झाली असताना आराखड्यातील कामांना मंजुरी देण्याकडे जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी दिसत आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांतील लोकांना रानोमाळ भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर केला जातो. कोल्हापुरात पाऊस चांगला होत असतो. त्यामुळे प्रशासन जानेवारीअखेरपर्यंत आराखडा तयार करत नाही, पण यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबर ते जूनपर्यंत पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. आराखडा दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे; परंतु आतापर्यंत फक्त सहा कामेच सुरू झाली आहेत. उन्हाच्या झळा वाढत असल्यामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. विंधन विहिरीचे पाणी जात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाई गंभीर होत आहे. टंचाईग्रस्त गावांतून उपाययोजनांसाठी मागणी होत आहे पण गाव, तालुका पातळीवरील शासकीय यंत्रणा सुस्त आहे. टंचाईतील कामे अजून आराखड्यावरच आहेत. पाच कोटींचा आराखडा... जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यात २१९ गावे, ४०२ वाड्या-वस्त्यांसाठी ६२१ उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांची मागणी आहे. आतापर्यंत केवळ पाचगाव नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी दहा लाख, कळंबा, खडकेवाडा (ता. कागल) या गावात खासगी विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. इचलकरंजीत २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार पाणीपुरवठा सभापती : कृष्णेच्या डोहातील पाण्याचा १५० अश्वशक्तीच्या चार पंपांद्वारे उपसा इचलकरंजी : मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील डोहामध्ये १५० अश्वशक्तीचे चार सबमर्सिबल पंप सोडून तातडीने पाणी उपसा करण्याबरोबरच शहराला २८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी नगरपालिकेने केली असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी दिली. नगरपालिका सभागृहामध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहर विकास आघाडीच्यावतीने विठ्ठल चोपडे व कॉँग्रेसकडून शशांक बावचकर यांनी पाणीटंचाईचा विषय प्रकर्षाने मांडला. यावेळी गेल्या आठवड्याभरात पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतील पाण्याच्या वस्तुस्थितीबाबतचा आढावा जलअभियंता ए. एन. जकीनकर यांनी सांगितला. त्यानंतर सभापती झोळ म्हणाले, कृष्णा नदीपात्रामधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून, शुक्रवारी मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणीपुरवठ्याचा दुसरा पंप उघडा पडला आहे. दरम्यानच्या काळात शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धिकरण केंद्रातील जमिनीमधील पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात आल्या आहेत. यातून नगरपालिका व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या २८ टॅँकरमार्फत आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. त्याचबरोबर कूपनलिकांवर टाईमर बसवून त्याचे नियंत्रण केले जाईल. तसेच पंचगंगा नदीतील पाणी दूषित होणार नाही व पंचगंगा प्रवाही राहील, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसासुद्धा करता येईल का, याचाही प्रयत्न केला जाईल. या चर्चेमध्ये बावचकर, चोपडे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव, गटनेते महादेव गौड, बिस्मिल्ला मुजावर, रवी रजपुते, रणजित जाधव, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)(प्रतिनिधी)