शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

कमी व्यवहार होणारी ‘एटीएम’ बंद : दररोज १00 व्यवहारांचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:24 IST

कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देएकूण ४८५ पैकी १० टक्के एटीएमला लागणार कुलूप

रमेश पाटील।कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत जिल्ह्यात सध्या असलेल्या एटीएमच्या संख्येत दहा टक्क्यांनी घट करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या दुर्गम भागातील एटीएम बंद होऊ लागली आहेत.

कॅशलेस व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारने एटीएम संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या एटीएमवर जास्त व्यवहार आहेत अशीच एटीएम बँकांना काहीसा दिलासा देऊ शकतात. परंतु, ज्या एटीएमवर व्यवहार कमी आहेत, अशी एटीएम बँकेला तोट्यात नेतात. सध्या एटीएमचा खर्च परवडत नसल्याची बँकांची तक्रार आहे. एटीएम सेंटरचे भाडे, सुरक्षारक्षकाचा पगार, एटीएम आॅपरेटरचा खर्च, वीज भाडे, देखभाल-दुरुस्ती खर्च आदीमुळे एटीएमचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे बँका नवीन एटीएम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कमी व्यवहार असलेले एटीएम बंद करून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सध्या कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकजण आता आॅनलाईन व्यवहार करीत आहेत. अशावेळी एटीएमचा वापर साहजिकच कमी होत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनी दर दिवशी शंभर ट्रॉन्झेक्शन होत नसलेल्या एटीएमची पाहणी करून ती टप्प्याटप्याने बंद करण्याचे काम हाती घेतले आहे.

कोल्हापूर शहरात सुमारे २७५ एटीएम सेंटर आहेत. शहर आणि ग्रामीण भागात म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यात मिळून ४८५ एटीएम आहेत. यापैकी दहा टक्के म्हणजेच ४८ ते ५० एटीएम सेंटर बंद होणार आहेत. सध्या बंद करण्यात आलेली एटीएम मशीन एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये जादा बसवली जात आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या दहा टक्के एटीएम जरी बंद झाली तरी नजीकच्या काही महिन्यांत या बंद एटीएमच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे बँक वर्तुळातून सांगण्यात आले. शहरातील एटीएम मात्र, बंद होण्याची शक्यता कमी आहे. कारण शहरातील बहुतेक एटीएमवर योग्य त्या प्रमाणात व्यवहार होताना दिसत आहेत. असे जरी असले तरी पूर्वीसारखे मोठ्या थाटामाटात एटीएम सेंटरचे उद्घाटन आता राष्ट्रीयीकृत बँकांचे दिसण्याची शक्यता कमी आहे.

एटीएम सेंटरचा वाढता खर्च बँकांना परवडत नाही म्हणून जरी एटीएम बंद होत असली तरी लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठीच बँकांनी हा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र