शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

जिल्हा परिषदेचे साडेबत्तीस कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले, हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यातील प्रचंड पावसामुळे जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील घालवाड आणि नृसिंहवाडी प्राथमिक आराेग्य केंद्रांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. अरळगुंडी (ता. गडहिंग्लज), असळज (ता. गगनबावडा), उपकेंद्र पिपळे, केखले (ता. पन्हाळा) आणि आवळी बु. (ता. राधानगरी) या आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे.

महापुराचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना बसला आहे. इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग अशा ७० रस्त्यांचे नुकसान झाले असून, याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रूपयांची गरज भासणार आहे. तर जिल्हा परिषदेकडील आणखी ३६ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यासाठी ८ कोटी ६० लाख रूपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यातील १०४ शाळा आणि प्रशासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याठिकाणी ७१ शाळांना आणि पाच प्रशासकीय इमारतींना महापुराचा फटका बसला आहे.

चौकट

सात ठिकाणी कोसळली दरड

राधानगरी तालुक्यातील पनोरी फेजिवडे, बाजरीचा धनगरवाडा, दुर्गमनवाड ते मिसाळवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यात बुधवार पेठ ते सुपात्रे रस्ता, म्हाळुंगे मसाई देवालय रस्ता, बोरपाडळे ते भाडळे रस्ता खचला आहे. गगनबावडा तालुक्यातील म्हासुर्ली, बावेलीपासून पुढे मिळणाऱ्या रस्त्यावर तर शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण पाल सावर्डी ते इजोली आणि शाहूवाडी ते येळवडी रस्त्यावर दरड कोसळली आहे.

चौकट

अ.न. विभाग तपशील संख्या अंदाजे नुकसान

१ ग्रामीण पाणी पुरवठा पा. पु, योजना ४८७ ९ कोटी ८० लाख

२ बांधकाम रस्ते ७० १० कोटी

इमारती १०४ १ कोटी ६७ लाख

३ मुख्यमंत्री/प्रधानमंत्री सडक रस्ते ३६ ८ कोटी ६० लाख

४ शिक्षण शाळा ९८ १ कोटी ९६ लाख

५ अंगणवाडी इमारती १२ ९ लाख

६ आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र,/उपकेंद्र ५ १० लाख ६५ हजार

७ पशुसंवर्धन पशुधन ६३ १५ लाख १३ हजार

एकूण ३२ कोटी ३७ लाख

चौकट

संपर्क तुटलेली गावे ४११

स्थलांतरित कुटुंब संख्या ३४ हजार २८६

स्थलांतरित लोकसंख्या १ लाख ५० हजार ६५७

नातेवाईकांकडे स्थलांतरित १ लाख २६ हजार ४५५

शासकीय निवारागृहे २९९

निवारागृहात स्थलांतरित १ लाख ६३ हजार ३९९

कोविडबाधित पूरग्रस्त निवारागृहे १९

दाखल कोविडबाधित पूरग्रस्त १२१

स्थलांतरित जनावरे ६१ हजार ७२०

बंद पडलेल्या पाणी योजना ४८७

चौकट

शेतकऱ्यांच्या दक्षतेमुळे वाचले पशुधन

महापुराचा अंदाज आल्यानंतर यंदा शेतकरी शांत बसले नाहीत. त्यांनी सुरक्षित ठिकाणी पशुधन नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पशुधनाला महापुराचा फटका बसला नाही. जिल्ह्यातील ६० हजार ७९५ जनावरांना पशुपालकांनी महापुराआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर शिरोळ तालुक्यातील तीन आणि करवीर तालुक्यातील दोन अशा पाच छावण्यांमध्ये ९२५ पशुधन स्थलांतरित करण्यात आले.

कोट

राहुल पाटील यांचा फोटो वापरावा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी महापुराच्या बैठकांमध्ये चर्चा केली आहे. कोरोनामुळे एकीकडे जिल्हा परिषदेवरील कामाचा ताण वाढला आहे. अशातच महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडून तातडीने निधी मिळवून देण्याची विनंती केली आहे. प्राधान्याने कराव्या लागणाऱ्या कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.

- राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर

कोट

संजयसिंह चव्हाण यांचा फोटो वापरावा

नुकसानाचा हा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही काही गावांमधील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही. यामुळे काही ठिकाणी जाता आलेले नाही. त्यामुळे आणखी काही दिवसात नेमके किती नुकसान झाले, हे निश्चित होईल. प्रशासकीय सूचनांप्रमाणे याचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार निधीची मागणी केली जाईल.

- संजयसिंह चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर