शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

साखर कारखान्यांचा एफआरपीला खो

By admin | Updated: December 24, 2014 00:23 IST

ऊस दराचा तिढा : सभासदांच्या खात्यावर गुपचूप १९०० रुपये जमा

अशोक पाटील - इस्लामपूर -कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी उसाला किमान वैधानिक मूल्यानुसार (एफआरपी) दर दिला असला तरी, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र १९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काही कारखान्यांनी तर परस्परच १९०० रुपयांनुसार उसाचे बिल सभासदांच्या खात्यावर जमा केले आहे.गतवेळच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊसदारासाठी वेगवेगळी आंदोलने केली होती. प्रत्यक्ष दर ठरवताना मात्र ते एकत्र आले होते. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर होईपर्यंत कारखाने बंद ठेवणे पसंत केले होते. नेहमीपेक्षा दीड ते दोन महिने गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने, जादा दर मिळूूनही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.यंदा केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खा. राजू शेट्टी यांनी निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याने यावेळी त्यांनी ऊसदरप्रश्नी कोणतेही आंदोलन केलेले नाही. आमचेच सरकार असल्याने दर चांगलाच मिळणार, असा त्यांचा दावा आहे, परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १९०० रुपयांचा दर देऊन केंद्र शासनाच्या एफआरपीला कोलदांडा दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत.जिल्ह्यातील सोनहिरा व क्रांती साखर कारखान्यांनी १९०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करून तो जमाही केला. मात्र वाळव्याच्या हुतात्मा व साखराळेच्या राजारामबापू साखर कारखान्याने कोणतीही घोषणा न करता सभासदांच्या खात्यावर परस्परच १९०० रुपयांप्रमाणे पैसे जमा केल्याचे वृत्त आहे. याबाबत राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व ‘हुतात्मा’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाच्या भीतीने एफआरपीप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला, मात्र सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.