शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

‘सेतू’मध्ये शेतकºयांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:51 IST

कोल्हापूर : सात-बारा संगणकीकरण मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये सात-बारा आॅनलाईन करत असताना झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्णात सेतू केंद्रांतून शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक केली जात असून, दर ठरवून भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देतलाठ्यांचा भ्रष्टाचार टाळण्यासाठी सेतू केंद्रे सुरू करण्यात आली कोणत्याही नियमबाह्ण अटी घालू नयेत,

 दक्षता समितीच्या बैठकीत तक्रारी : अधिकाºयांची झाडाझडती; भ्रष्टाचाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सात-बारा संगणकीकरण मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये सात-बारा आॅनलाईन करत असताना झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्णात सेतू केंद्रांतून शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक केली जात असून, दर ठरवून भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. यावरून त्यांनी सभेत प्रशासनाला धारेवर धरले. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून, सेतू केंद्रांना कोणत्याही प्रकारे अशा प्रकारची रक्कम मागता येणार नाही अशा सूचना प्रशासनाने सेतू केंद्र चालविणाºयांना कठोर शब्दात द्याव्यात, असे आदेश खासदार शेट्टी यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेमध्ये दिले. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत वादळी चर्चा झाली.

जिल्हा संनियंत्रण समितीची सभा खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात झाली. स्वत: अध्यक्षांनीच या विषयाला तोंड फोडले. यावेळी पुणे महसूलचे उपायुक्त चंद्रकांत भुयेवाड, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, प्रभारी प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, आदी उपस्थित होते.शेट्टी म्हणाले,‘तलाठ्यांचा भ्रष्टाचार टाळण्यासाठी सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आणि तिथे पुन्हा शोषणच सुरू आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून शेतकºयांची गरज किती तीव्र आहे, त्यावरून पैसे उकळले जातात. जामिनासाठी दाखला हवा असेल तर ही रक्कम ५०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत आहे.गणवेशासाठी ४०० अनुदान..५०० खर्चजिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान थेट पालकांच्या खात्यावर जमा करण्याची योजना आहे; परंतु त्यासाठी बँकेत खाते सुरू करण्यासाठी ५०० रुपयापेक्षा जास्त खर्च येतो, अशीही तक्रार बैठकीत झाली.जन-धन योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँका शून्य बॅलेन्सवर खाते उघडण्यात सहकार्य करत नसल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. बँकांनी खाते उघडण्यासाठी कोणत्याही नियमबाह्ण अटी घालू नयेत, अशा सूचना खासदार शेट्टी यांनी दिल्या.बँका आज-उद्या सुरू राहणारपीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ आहे. अल्प कालावधी लक्षात घेता व अंतिम दिनांकास शेतकºयांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने निमशहरी व ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँका आज, रविवारी तसेच ज्या बँकांना सोमवारी साप्ताहिक सुटी असते त्या बँकासुद्धा सोमवारी सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. जी. किंणिगे यांनी सांगितले.