शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड तालुक्यात गौण खनिजाची लूट

By admin | Updated: May 1, 2015 00:23 IST

तालुका बकाल होण्याच्या मार्गावर : अधिकाऱ्यांची डोळेझाक, अवैध उत्खननावर कारवाईसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

शिवाजी सावंत - गारगोटी -नैसर्गिक साधनसंपत्ती व जैवविविधतेने नटलेल्या या तालुक्यात राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी असणारे अधिकारी डोळेझाक करत असल्यामुळे इथली माफिया मंडळी राजरोसपणे लूट करीत असून, लवकरच हा तालुका बकाल होण्याच्या मार्गावर आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही. लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही पर्यायी यंत्रणा नसल्याने, तसेच झोपेचे सोंग उत्तम वटविणाऱ्या या अधिकाऱ्यांना कोण चाप लावणार? असा सवाल तालुकावासीय व निसर्गप्रेमी विचारत आहेत.भुदरगड तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्य आणि संपत्ती बहाल केली आहे. इथे अनेक वनौषधी व इतर दुर्मीळ वृक्ष आहेत, तर जमिनीत विपूल खनिजांचा साठा आहे. २०१२ अखेर अगदी तुरळक स्वरूपात येथे गौण खनिज व वृक्षतोड यांची चोरटी निर्यात होत होती. बॉक्साईट म्हणजे काय? याचा सुगावा स्थानिक जनतेला लागलेला नव्हता. परंतु, या मातीत खनिजे सापडत असल्याचा शोध लागताच बाहेरील कारखानदार ही माती घेण्यासाठी तयार झाले, मागणी करू लागले. त्यानंतर ज्या-त्या शेतमालकांनी माती देण्यास सुरुवात केली. यामध्ये कारखानदार व शेतकरी यांच्यातील ‘दलाल’ दलाली खाऊन मातब्बर झाले आहेत. तोच प्रकार शाडू माती, विटांसाठी अथवा घरांसाठी लागणाऱ्या मातीसंबंधी आहे. गेल्यावर्षी वीटभट्टीसाठी आणि घरांसाठी म्हणजे पर्यायाने जीवनावश्यक निवाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीची रॉयल्टी भरली नसल्याने हजारो रुपयांचा दंड वीट व्यावसायिकांना केला; पण बॉक्साईट वाहतूक शेकडो ट्रक तालुक्यातून बाहेर जात असताना त्यांच्यावर या अलीकडच्या काही महिन्यांत कारवाई का? त्यापूर्वी ते ट्रक दिसत नव्हते का?शेळोली येथे एक कारखाना उभारला गेला व तो कारखाना ही शाडू माती विकत घेऊ लागला. परिणामत: कोणीही विचारेना, अशी झालेल्या या मातीचे मूल्य वाढले आणि शेतकरी माती विकू लागला. अगदी कवडीमोल दराने विकली जाणारी ही माती विकूनसुद्धा विकणारे शेतकरी लखपती झाले आहेत. ही एवढी उलथापालथ होत असताना महसूल विभागाकडे गणेशमूर्तीसाठी माती उचलण्याचा परवाना मागितला जात होता. हे शाडूचे गणपती कोठे तयार केले जात आहेत? याची चौकशी महसूल विभागाने करून या निसर्गमित्र कारागिरांचा सत्कार करणे आवश्यक होते; पण तालुक्यात एकही गणपती शाडूचा नसताना हा शाडू जातो कोठे? याची माहिती या विभागास नाही म्हणणे धाडसाचे होईल.महसूल विभागाने सन २०१४-२०१५ या अहवाल सालात माती एक हजार नऊशे वीस, दगड पाच हजार चारशे, तर मुरूम तीस ब्रास उत्खनन व वाहतुकीसाठी परवानगी दिली. त्यापोटी अनुक्रमे प्रतिब्रास माती शंभर रुपये, दगड दोनशे रुपये, मुरूम दोनशे रुपये आकारले गेले. यापोटी त्यांना रॉयल्टी मिळाली; पण आज तालुक्यातील ११४ गावांमध्ये इंदिरा आवासची ३०२, तर खासगी हजारो घरे, शेकडो कि. मी. रस्ते, हजारो टन बॉक्साईट, हजारो टन वाळू उपसा होत आहे, हे खात्याला दिसले आहे की नाही? दगडाच्या व मातीच्या खाणी पंचवीस ते पन्नास फूट खाली जात आहेत, तर प्रदूषणाने पिके खराब होत आहेत. वाळू उपशामुळे पाणी दूषित होत आहे. तालुक्यातील नदीकाठच्या जनतेच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. खाणींचे पुनर्भरण न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचते, तर ज्या खाणी बंद पडल्या आहेत, तेथे घाण पाणी साचून अनेक रोगांचे जंतू तयार होत आहेत.निसर्गसंपन्न तालुक्याला दृष्टदोन खाणी अधिकृत, त्याही बंद स्थितीत असतानासुद्धा अनधिकृत खाणी वारेमाप आणि बेफाम स्थितीत सुरू आहेत. रक्षकच भक्षक झाल्याने या निसर्गसंपन्न तालुक्याला दृष्ट लागली आहे. या खाणी व अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी, अशी मागणी तालुकावासीयांतून होत आहे.आमच्या विभागातील संबंधित लोकांनी खाणींचे मोजमाप करुन त्याची आकडेवारी ज्या-त्या तहसील विभागाकडे पाठविली आहे. - ए. एस. भोगे, जिल्हा खाणकर्म अधिकारी आमच्याकडे कडगाव व वेसर्डे येथील दोन खाणी नोंदणीकृत आहेत; पण त्या दोन्ही बंद आहेत.- शिल्पा ओसवाल, तहसीलदार