शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग व्यवसाय सुरळीत करण्यासाठी संघर्ष करणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

: सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : देशातील सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय असतानाही राज्य सरकारचे याकडे ...

: सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : देशातील सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय असतानाही राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच वीजदरात एक रुपया व व्याजामध्ये पाच टक्के सवलतीचा लाभ मिळत नसल्याने यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यातील यंत्रमाग संक्रमण अवस्थेतून जात असल्याने या उद्योगाला सावरण्यासाठी वीज दरात एक रुपयाची व व्याजामध्ये पाच टक्के सवलत देण्याची घोषणा तत्कालीन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. तसेच विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने सवलत देणे गरजेचे आहे. तसेच दोन हजार ३०० प्रकरणे पाच टक्के व्याजासाठी मुंबईला पाठवून दिल्याचे सांगितले. त्यावर कार्यवाही केली नाही. वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे कोणाकडूनही केली जात नाहीत. समाजातील अनेक घटकांना कोरोना काळातील मोबदला मिळाला आहे. परंतु, सरकारने यंत्रमाग कामगारांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. त्यामुळे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत यंत्रमाग व्यवसाय सुरळीतपणे सुरू होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असे आमदार आवाडे म्हणाले.