शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला पर्यटनाचा लूक

By admin | Updated: November 17, 2014 23:55 IST

संगणकप्रणालीचा वापर : केवळ दोन माणसांवर ८० एकर जमीन

प्रकाश पाटील-कोपार्डे -खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा विचार करता आज पारंपरिक शेती परवडेनाशी झाली आहे. उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसेना झाला आहे. पण, याच शेतीला आधुनिकतेची जोड आणि योग्य नियोजन केल्यास अल्प मनुष्यबळातही उत्कृष्ट पद्धतीने शेती करता येते. उत्पन्नही भरघोस मिळते. पन्हाळा तालुक्यातील बोरगावसारख्या दुर्गम भागात संगणक प्रणालीचा वापर करून अवघ्या दोनच मजुरांवर सुमारे ८० एकर जमीन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणी नरके घराण्यातील संदीप नरके हेच ते कृषीपंडित. त्यांनीच हा प्रकल्प राबविला असून, शेतीला पर्यटनाचा दर्जा देण्याचाही ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत. शंभर वर्षांपूर्वी बोरगाव भागातच त्यांच्या पूर्वजांनी शेतीसाठी ज्या यंत्रांचा वापर केला त्यांचेही जतन केले आहे.बोरगाव येथे नरके यांची १०० ते १२५ एकर जमीन आहे. यातील ८० एकर जमिनीमध्ये ऊस, केळी, भुईमूग, नाचणा या पिकांबरोबर जनावरांचा गोठा व नामशेष होत चाललेली आयुर्वेदिक फळझाडे व मसाल्यांचा झाडांचाही समावेश आहे. नरके यांनी अलीकडेच म्हणजे पाच वर्षांपासून शेती करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या एकूण शेतीमध्ये उसाचे क्षेत्र मोठे होते. पाण्याबरोबर वेळेच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन हाच पर्याय केला. त्यांनी ५३ बाय ५३ व १६ फूट खोल असे मोठे शेततळे निर्माण केले. तळ्यावर संपूर्णत: संगणकीय कार्यप्रणालीचा वापर केला. संगणकावर प्रोग्रॅम तयार करून केवळ एक व्यक्ती ३५ एकर क्षेत्रांवरील असणाऱ्या पिकांना पाणी देते. टाक्यांमध्ये खते टाकली जातात व पाणी सुरू असताना योग्यवेळी ही खते ठिबकमधून पिकांच्या मुळाशी जातात. त्यामुळे उघड्यावर पडणाऱ्या खतांचे हवेतच विघटन न होता त्याचा फायदा उत्पन्नवाढीवर झाल्याने एकरी ४० टनांनी उसाचे उत्पन्न वाढल्याचे नरके यांनी सांगितले.कृषी पर्यटन केंद्र निर्माण करण्यास संदीप नरकेंकडून सुरुवात संदीप नरके यांचे पणजोबा चंद्रोबा नरके यांनी शंभर वर्षांपूर्वी शेतात यांत्रिकीकरणास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे आजोबा डी. सी. नरके यांनीही शेतीमध्येयांत्रिकीकरण करत प्रगतशील शेती केली. त्यांनी पाणी खेचण्यासाठी वापरलेले १८७६ मध्ये तयार झालेले फिटर फिल्डिंग इंजिन (मेन इन इंग्लंड), ४० एचपी., यु. एस. आय. मेक-व्हिटा इंजिन - १५/१६ एच.पी, इस्टन इंजिन (लिंकन), ३६ एच. पी. यांसह तेलघाणा, हॉलर (भात व नाचणी कांडणीसाठी), २ चक्की ही यंत्रसामुग्री आजही चालू स्थितीत ठेवली आहेत. आज रस्त्यावर सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनसारखेच पण घोड्यांद्वारे ओढले जाणारे अ‍ॅडम्स लिनिंग व्हील ग्रॅँडर हे मशीनही चालू स्थितीत आहे. ७० वर्षांपूर्वीचा फोर्डसन (मेजर) कंपनीचा मोठा ट्रॅक्टरही चालू स्थितीत आहे. ही सर्व यंत्रसामग्री जोपासत आधुनिक यंत्रसामग्रीचा शेतीसाठी केलेला वापर याचे दर्शन भावी पिढीला व्हावे, यासाठी बोरगाव (ता. करवीर) येथील नरके कॅम्प ‘कृषी पर्यटन केंद्र’ म्हणून निर्माण करण्याचा मानस नरके यांनी व्यक्त केला आहे.भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या युवा पिढीने पुन्हा निसर्गाकडे यायचे झाल्यास शेती हाच मार्ग आहे. शास्त्रशुद्ध शेती कशी करावी, याचा अभ्यास करून प्रत्येक अडचणींवर मार्ग शोधत शेती व्यवसाय फायद्याचा कसा होऊ शकतो, हे एक आदर्श उदाहरण युवा पिढीच्या पुढे ठेवून शेतीत रमलो आहे.- संदीप नरकेशाळकरी मुलांसाठी ठरणार आकर्षणबोरगाव येथील ‘कृषी पर्यटन केंद्र’ म्हणून आकाराला येत असलेल्या नरके कॅम्पमध्ये किमान १०० शाळकरी मुलांना बसून मुंबईस्थित असणाऱ्या ‘तारांगण’च्या पद्धतीवर हॉल तयार केला आहे. यामध्ये तारांगणाच्या अनुभूतीबरोबर स्लाईड शोद्वारे पारंपरिक शेती, अत्याधुनिक शेती, हवामान बदलाचा परिणाम, रेन हार्वेस्टिंंग यांसह अन्य माहिती स्लाईड शोद्वारे देण्यात येणार आहे.ठिबकमुळे आठ दिवसांत एकरी सव्वापाच लाख लिटर पाण्याची बचत.पाटपद्धतीने पाणी दिल्यास एकरी ६ ते ७ लाख लिटर पाणी खर्ची पडते.पिकांच्या मुळाशी मदत करणाऱ्या सेंद्रिय खतांचाही समावेश करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.शेतातील ठिबक सिंचनच्या तांत्रिक बाजू संजय बुटाले यांनी निर्मिल्या आहेत.