शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

भूजल पातळीवर यंत्राद्वारे नजर

By admin | Updated: February 11, 2015 00:15 IST

विशेष संरक्षित क्षेत्रात कडक नियम-- पाण्याच्या स्रोतांचे समिती करणार आॅडिट

प्रकाश पाटील - कोपार्डे - पाण्याचा उपसा व भूजल पातळीची वाढ आणि घट यांच्या नोंदी वेळोवेळी घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर आलेखक व जलप्रमाण यंत्रे लावली जाणार आहेत. या यंत्रांमुळे प्रत्येक गावाची भूजल पातळी आणि त्यात किती घट किंवा वाढ झाली, हे कळणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून बांधकाम आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. याचा थेट परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर आणि भूजल पातळीची घट होण्यावर होतो. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भूगर्भातून पाण्याच्या होत असलेल्या अतिरिक्त उपशावर निर्बंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ हा कायदा १ जून २०१४ पासून राज्यात लागू केला. यातील तरतुदीनंतर पाण्याच्या पातळीच्या वेळोवेळी नोंदी घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर जलपातळी आलेखक यंत्र व जलप्रमाण ही दोन यंत्रे लावली जाणार असून, यंत्रामुळे प्रत्येक गावाची भूजल पातळी आणि त्यात किती घट व वाढ होते, हे सहज समजणार आहे.एकूणच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर लावण्यात येणाऱ्या दोन्ही यंत्रांमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचे संवर्धन शक्य होईल. सध्या ही यंत्रे नसल्याने भूजल सर्वेक्षण विभागातर्फे प्रत्येक गावातील ठरावीक निरीक्षण करून भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जात होत्या; पण आता लावण्यात येणाऱ्या जलपातळी आलेखक व जलप्रमाण यंत्राद्वारे अचूक नोंदी घेणे शक्य होईल. मीटर टेपच्या साहाय्याने भूजल पातळी मोजण्याची पद्धतही कालबाह्य होणार असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे एखाद्याने पिण्याच्या पाण्याच्या संरक्षित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून विहीर किंवा बोअरवेलचे खोदकाम केल्यास त्यांच्यावर कारवाई करून खोदकामाचे साहित्य जप्त केले जाणार आहे. नोंदी घेण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी व पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीच्या सदस्यांची राहणार आहे. एखाद्या गावच्या भूजल पातळीत घट झाल्यास ती वाढविण्यासाठी व उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम समिती करेल.