शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:00 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट काळजाला हात घालायचा; चौथा कोणताही आरोप बेधडकपणे करायचा, तर पाचवा बोलताना हसून-हसून मुरकुंड्या वळायच्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचाराचा धुरळा उडाला असताना बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे आणि पतंगराव कदम यांची उणीव नेते, कार्यकर्त्यांना भासत आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे जरी वय झाले होते तरी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आतुर असायचा. गेल्याच लोकसभेच्या आधी त्यांचे निधन झाले; परंतु आजही शिवसेनेच्या सभा होताना त्यांची आठवण निघते.विलासराव देशमुख यांचेही गेल्या लोकसभेच्या आधी म्हणजेच १४ आॅगस्ट २०१२ रोजी निधन झाले असले तरी आजही कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विद्यमान परिस्थितीमध्ये त्यांची उणीव जाणवते. आपल्या दिलखुलास स्टाईलमध्ये, मान हलवत खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत देशमुख जे बोलायचे, त्याचा प्रभाव पडायचा. हा माणूस बोलायला उभा राहिला की चित्रच डोळ्यांसमोर उभं करायचा. ‘रोजगार हमीवर काम करणाºया पोराला या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचं काम केवळ पवारसाहेबच करू शकतात,’ असे आपल्या स्टाईलमध्ये सांगून शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा मजबूत करण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे सांगणारे आर. आर. पाटील यांची म्हणूनच आज उणीव भासते. त्यांच्या बोलण्यातील सच्चेपणामुळेच कार्यकर्ते त्यांच्यावर फिदा असायचे.समोरचा विरोधक कितीही मोठा असो; त्याच्याबाबतीत बोलताना भीडभाड न ठेवणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. आपल्या रांगड्या शैलीमध्ये राज्यातील बहुजन समाजाला आवाहन करणारा हा नेता बोलत असताना ज्या पद्धतीने बोलत असायचा ती पद्धत कार्यकर्त्यांना आवडायची. ३ जून २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र आजही भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासतच असणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील दिलखुलास माणूस म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते पतंगराव कदम. त्यांचे निधन ९ मार्च २०१८ रोजी झाले. अन्यथा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेत, ‘एकमेकांची जिरविण्यामध्ये आमचीच जिरली आहे. आता ही जिरवाजिरवी पुरे झाली,’ असे सांगत पतंगरावांनी निश्चितच कॉँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचे कान टोचले असते यात शंका नाही.प्रचार शिगेला, चौफेर बोलणाऱ्यांची वानवासर्वच पक्षांकडे चौफेर बोलणाºया वक्त्यांची वानवा असल्याचे दिसून येते. जनतेची नस ओळखलेले, आपल्या शैलीने लाखोंच्या सभेला खिळवून ठेवणारे, मुद्द्यांची प्रभावी मांडणी करणारे प्रभावी नेते मोजकेच आहेत. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासतच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक