शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:00 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट काळजाला हात घालायचा; चौथा कोणताही आरोप बेधडकपणे करायचा, तर पाचवा बोलताना हसून-हसून मुरकुंड्या वळायच्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचाराचा धुरळा उडाला असताना बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे आणि पतंगराव कदम यांची उणीव नेते, कार्यकर्त्यांना भासत आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे जरी वय झाले होते तरी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आतुर असायचा. गेल्याच लोकसभेच्या आधी त्यांचे निधन झाले; परंतु आजही शिवसेनेच्या सभा होताना त्यांची आठवण निघते.विलासराव देशमुख यांचेही गेल्या लोकसभेच्या आधी म्हणजेच १४ आॅगस्ट २०१२ रोजी निधन झाले असले तरी आजही कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विद्यमान परिस्थितीमध्ये त्यांची उणीव जाणवते. आपल्या दिलखुलास स्टाईलमध्ये, मान हलवत खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत देशमुख जे बोलायचे, त्याचा प्रभाव पडायचा. हा माणूस बोलायला उभा राहिला की चित्रच डोळ्यांसमोर उभं करायचा. ‘रोजगार हमीवर काम करणाºया पोराला या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचं काम केवळ पवारसाहेबच करू शकतात,’ असे आपल्या स्टाईलमध्ये सांगून शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा मजबूत करण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे सांगणारे आर. आर. पाटील यांची म्हणूनच आज उणीव भासते. त्यांच्या बोलण्यातील सच्चेपणामुळेच कार्यकर्ते त्यांच्यावर फिदा असायचे.समोरचा विरोधक कितीही मोठा असो; त्याच्याबाबतीत बोलताना भीडभाड न ठेवणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. आपल्या रांगड्या शैलीमध्ये राज्यातील बहुजन समाजाला आवाहन करणारा हा नेता बोलत असताना ज्या पद्धतीने बोलत असायचा ती पद्धत कार्यकर्त्यांना आवडायची. ३ जून २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र आजही भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासतच असणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील दिलखुलास माणूस म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते पतंगराव कदम. त्यांचे निधन ९ मार्च २०१८ रोजी झाले. अन्यथा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेत, ‘एकमेकांची जिरविण्यामध्ये आमचीच जिरली आहे. आता ही जिरवाजिरवी पुरे झाली,’ असे सांगत पतंगरावांनी निश्चितच कॉँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचे कान टोचले असते यात शंका नाही.प्रचार शिगेला, चौफेर बोलणाऱ्यांची वानवासर्वच पक्षांकडे चौफेर बोलणाºया वक्त्यांची वानवा असल्याचे दिसून येते. जनतेची नस ओळखलेले, आपल्या शैलीने लाखोंच्या सभेला खिळवून ठेवणारे, मुद्द्यांची प्रभावी मांडणी करणारे प्रभावी नेते मोजकेच आहेत. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासतच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक