शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Lok Sabha Election 2019 स्वतंत्र प्रचार करा, पण निवडणुकीत सक्रीय व्हा -- प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:50 IST

या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून, त्याचा लाभ विधानसभेला होणार आहे; त्यामुळे कोणी बोलावेल याची वाट

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून प्रचाराचे निरोप नसल्याच्या तक्रारी

कोल्हापूर : या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून, त्याचा लाभ विधानसभेला होणार आहे; त्यामुळे कोणी बोलावेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:हून बाहेर पडून प्रचार करा; पण निवडणुकीत सक्रीय व्हा, अशा सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केल्या.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी काँग्रेस कमिटीत तालुकाध्यक्षांचा मेळावा झाला. या बैठकीत आवाडे यांनी मार्गदर्शन करताना वरील सूचना दिल्या. दरम्यान या मेळाव्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांचा तक्रारीचा सूर कायम होता. राष्ट्रवादीकडून प्रचाराला येण्यासाठी कोणतेही निरोप दिले जात नाहीत. जाहीरनाम्यासह प्रचाराचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही, असे असेल तर आपण त्यांच्या प्रचाराला तरी कशाला जायचे, असा संतप्त सूर जिल्हाध्यक्षांच्या समोरच तालुकाध्यक्षांनी आळवला.

भुदरगड तालुकाध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, तालुक्यात अजूनही दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वय दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आम्हाला विचारातही घेत नाहीत. आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर म्हणाले, आम्हाला अजून प्रचाराचे साहित्य मिळालेले नाही. जाहीरनामा नसल्याने लोकांसमोर काय मांडणी करायची, असा प्रश्न पडला आहे. सरलाताई पाटील म्हणाल्या, रोजच्या रोज प्रचाराचे नियोजन दिले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांनीच सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तो दूर करावा.

दीपा पाटील म्हणाल्या, मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून प्रचारात सक्रीय होण्याची गरज आहे. कागल तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे म्हणाले, आम्ही स्वत:हून प्रचारात सक्रीय झालो आहोत, याची नेत्यांनी दखल घेण्याची गरज आहे.सर्व भावना ऐकून घेतल्यानंतर आवाडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून फक्त काँग्रेससाठी म्हणून प्रचारात सक्रीय व्हा, असे आवाहन केले. यावेळी संध्या घोटणे, मंगल खुडे, एस. के. माळी, संपत पाटील, नारायण थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.महिला पदाधिकाऱ्यांत वादमहिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे व चंदा बेलेकर यांच्यात बैठकीनंतर कमिटीच्या कार्यालयातच जोरदार वाद झाला. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे आतील कार्यालयात चर्चा करत बसलेले असतानाच या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सेल्फी फोटो काढत असताना चंदा बेलेकर यांचा हात अडवा येत असल्याने, तो काढावा, असे साळोखे यांनी सांगितले. यावरून दोघींमध्ये वादाला तोंड फुटले. कोणाच्या मागे किती लोक आहेत, कोण किती महिला गोळा करून आणते येथपासून ते कमिटीत आल्यावर कायमच पदाधिकाºयांकडून अपमान होणार असेल तर कमिटीत यायचे की नाही ते सांगा? असा पवित्रा साळोखे यांनी घेतला. हमरीतुमरीवर गेलेला वाद अखेर आवाडे यांनी दरडावून मिटविला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर