शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

Lok Sabha Election 2019 स्वतंत्र प्रचार करा, पण निवडणुकीत सक्रीय व्हा -- प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:50 IST

या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून, त्याचा लाभ विधानसभेला होणार आहे; त्यामुळे कोणी बोलावेल याची वाट

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून प्रचाराचे निरोप नसल्याच्या तक्रारी

कोल्हापूर : या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून, त्याचा लाभ विधानसभेला होणार आहे; त्यामुळे कोणी बोलावेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:हून बाहेर पडून प्रचार करा; पण निवडणुकीत सक्रीय व्हा, अशा सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केल्या.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी काँग्रेस कमिटीत तालुकाध्यक्षांचा मेळावा झाला. या बैठकीत आवाडे यांनी मार्गदर्शन करताना वरील सूचना दिल्या. दरम्यान या मेळाव्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांचा तक्रारीचा सूर कायम होता. राष्ट्रवादीकडून प्रचाराला येण्यासाठी कोणतेही निरोप दिले जात नाहीत. जाहीरनाम्यासह प्रचाराचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही, असे असेल तर आपण त्यांच्या प्रचाराला तरी कशाला जायचे, असा संतप्त सूर जिल्हाध्यक्षांच्या समोरच तालुकाध्यक्षांनी आळवला.

भुदरगड तालुकाध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, तालुक्यात अजूनही दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वय दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आम्हाला विचारातही घेत नाहीत. आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर म्हणाले, आम्हाला अजून प्रचाराचे साहित्य मिळालेले नाही. जाहीरनामा नसल्याने लोकांसमोर काय मांडणी करायची, असा प्रश्न पडला आहे. सरलाताई पाटील म्हणाल्या, रोजच्या रोज प्रचाराचे नियोजन दिले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांनीच सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तो दूर करावा.

दीपा पाटील म्हणाल्या, मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून प्रचारात सक्रीय होण्याची गरज आहे. कागल तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे म्हणाले, आम्ही स्वत:हून प्रचारात सक्रीय झालो आहोत, याची नेत्यांनी दखल घेण्याची गरज आहे.सर्व भावना ऐकून घेतल्यानंतर आवाडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून फक्त काँग्रेससाठी म्हणून प्रचारात सक्रीय व्हा, असे आवाहन केले. यावेळी संध्या घोटणे, मंगल खुडे, एस. के. माळी, संपत पाटील, नारायण थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.महिला पदाधिकाऱ्यांत वादमहिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे व चंदा बेलेकर यांच्यात बैठकीनंतर कमिटीच्या कार्यालयातच जोरदार वाद झाला. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे आतील कार्यालयात चर्चा करत बसलेले असतानाच या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सेल्फी फोटो काढत असताना चंदा बेलेकर यांचा हात अडवा येत असल्याने, तो काढावा, असे साळोखे यांनी सांगितले. यावरून दोघींमध्ये वादाला तोंड फुटले. कोणाच्या मागे किती लोक आहेत, कोण किती महिला गोळा करून आणते येथपासून ते कमिटीत आल्यावर कायमच पदाधिकाºयांकडून अपमान होणार असेल तर कमिटीत यायचे की नाही ते सांगा? असा पवित्रा साळोखे यांनी घेतला. हमरीतुमरीवर गेलेला वाद अखेर आवाडे यांनी दरडावून मिटविला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर