शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Lok Sabha Election 2019 काँग्रेसच्या स्टार नेत्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:58 IST

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रचारासाठी वानवा भासत असल्याचे चित्र दिसत ...

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रचारासाठी वानवा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वत:च्या मतदारसंघात अडकून पडले आहेत आणि जनमाणसांवर प्रभाव पाडेल, असा उत्तम वक्ता काँग्रेसकडे नसल्याने राज्यात सगळीकडेच ही समस्या भासत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातील अंतर्गत संघर्षाचीही त्यास झालर आहे.पश्चिम महाराष्ट्रात दहापैकी सोलापूर आणि पुणे या दोनच जागा काँग्रेस लढवत आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्या आघाडीचा स्वाभिमानी पक्षही घटक आहे. त्यामुळे जिथे राष्ट्रवादी व ‘स्वाभिमानी’चे उमेदवार रिंगणात आहेत, तिथे प्रचारासाठी मित्रपक्षांच्या नेत्यांनाही मागणी आहे; परंतु काँग्रेसकडून सुषमा अंधारे वगळता एकाही राज्यस्तरावरील प्रमुख नेत्यांची सभा या मतदारसंघात झालेली नाही. या घडीला लोकांवर प्रभाव टाकेल व ज्यांची भाषणे ऐकायला लोक जमतील असा एकही नेता प्रदेश काँग्रेसकडे नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याने ते मुलाच्या प्रचारात गुंग आहेत. काँग्रेस विदर्भात जास्त जागा लढवत आहे व तिथे काही जागांवर त्या पक्षाची स्थिती चांगली असल्याने त्या जागांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गेली दोन दिवस औरंगाबाद व अकोला मतदारसंघांत प्रचारासाठी गेले होते. त्यांना जो उमेदवार सभेला बोलावेल त्या उमेदवाराला काँग्रेसकडून निधी कमी मिळत असल्याची चर्चा आहे.राहुल किंवा प्रियांका गांधी यांची सभा किंवा एखादा रोड शो तरी पश्चिम महाराष्ट्रात व्हावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे; परंतु त्याबद्दल राज्यस्तरावरूनही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शरद पवार यांनाही परवा पत्रकारांनी त्याबद्दल विचारल्यावर त्यांनी थेट उत्तर न देता उद्वेग व्यक्त केला.पी. एन. व आवाडे यांचाच काय तो आधारकोल्हापुरात तरी राष्ट्रवादीला आता प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचाच मोठा आधार वाटत आहे. ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे स्टार प्रचारक झाले आहेत. तिकडे हातकणंगले मतदारसंघात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांची मदत होत आहे; पण गंमत अशी की आवाडे यांना मानणारा कोल्हापूर मतदारसंघात व पी. एन. यांना मानणारा हातकणंगले मतदारसंघात फारसा वर्ग नाही. त्यामुळे ते ही एकाच मतदारसंघांत अडकले आहेत. आमदार सतेज पाटील हे काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा घेण्यात अनेक जोडण्या लावत होते, परंतु तेच या निवडणुकीत विरोधात असल्याने सगळेच घोडे अडले आहे. त्यामुळेही राज्यस्तरावरील कोण नेते इकडे फिरकायला तयार नसल्याचे चित्र दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक