शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Lok Sabha Election 2019 कडक उन्हात, प्रचार तापला ! उद्या सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:52 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले आहे. प्रचारफेऱ्या, गाठीभेटी, जोडण्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून हवा करण्याचा प्रयत्न असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत धुरळा उडाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत थेट दुरंगी लढत होत असल्याने प्रचारातही कमालीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. मंगळवारी (दि. २३) दोन्ही मतदारसंघांत मतदान होत असून त्यासाठीचा जाहीर प्रचार उद्या, सायंकाळी सहा वाजता बंद करावा लागणार आहे. दोन दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ करावी लागणार आहे. या अगोदर जरी प्रचाराचे एक-दोन टप्पे झाले असले तरी शेवटी मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. गावागावांत पदयात्रा काढून हवा करण्याची जबाबदारी उमेदवारांनी स्थानिक नेत्यांवर दिली आहे.पालकमंत्र्यांचे आज सहा मेळावेपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी शहरात विविध ठिकाणी सहा मेळाव्यांचे आयोजन केले आहे.शनिवारी सकाळी ९ वाजता राजारामपुरी मुख्य रस्त्यावर पदयात्रा होणार असून, १0 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय बेलबाग मंगळवार पेठ, ११ वाजता लोळगे लॉन फिरंगाईजवळ वाजता इंद्रायणी सांस्कृतिक हॉल रंकाळा टॉवरजवळ, दुपारी १ वाजता नष्टे मंगल कार्यालय, महावीर गार्डन जवळ, २ वाजता त्र्यंबोली मंगल कार्यालय, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसमोर, सदर बझार या ठिकाणी मंडलनिहाय हे मेळावे होणार आहेत.शेवटच्या जोडण्यांसाठी टोकाचे प्रयत्नलोकसभा निवडणुकीत चुरस अनेक वेळा आपण पाहिली; पण इतकी ईर्षा कधीच नव्हती. काठावरची लढत असल्याने शेवटच्या टप्प्यात जोडण्यांसाठी दोन्ही बाजूंनी टोकाचे प्रयत्न सुरू आहेत.सोशल मीडियाच्या हत्याराला ‘धार’या निवडणुकीत जाहीर सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सोशल मीडियातून एकमेकांवर वार करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडलेली नाही. शेवटच्या टप्प्यात या माध्यमाचा प्रभावी ‘हत्यार’ म्हणून वापर करण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी उमेदवारांचे स्वतंत्र पथक असून एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत मतदारांत संभ्रम व बदनामी करून मत परिवर्तनाची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. जाहीर प्रचार जरी बंद झाला तरी मतदानापर्यंत हे ‘हत्यार’ उमेदवारांच्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक