शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Lok Sabha Election 2019 कडक उन्हात, प्रचार तापला ! उद्या सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:52 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या, रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले आहे. प्रचारफेऱ्या, गाठीभेटी, जोडण्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून हवा करण्याचा प्रयत्न असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.लोकसभेच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत धुरळा उडाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत थेट दुरंगी लढत होत असल्याने प्रचारातही कमालीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. मंगळवारी (दि. २३) दोन्ही मतदारसंघांत मतदान होत असून त्यासाठीचा जाहीर प्रचार उद्या, सायंकाळी सहा वाजता बंद करावा लागणार आहे. दोन दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ करावी लागणार आहे. या अगोदर जरी प्रचाराचे एक-दोन टप्पे झाले असले तरी शेवटी मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. गावागावांत पदयात्रा काढून हवा करण्याची जबाबदारी उमेदवारांनी स्थानिक नेत्यांवर दिली आहे.पालकमंत्र्यांचे आज सहा मेळावेपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी शहरात विविध ठिकाणी सहा मेळाव्यांचे आयोजन केले आहे.शनिवारी सकाळी ९ वाजता राजारामपुरी मुख्य रस्त्यावर पदयात्रा होणार असून, १0 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय बेलबाग मंगळवार पेठ, ११ वाजता लोळगे लॉन फिरंगाईजवळ वाजता इंद्रायणी सांस्कृतिक हॉल रंकाळा टॉवरजवळ, दुपारी १ वाजता नष्टे मंगल कार्यालय, महावीर गार्डन जवळ, २ वाजता त्र्यंबोली मंगल कार्यालय, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसमोर, सदर बझार या ठिकाणी मंडलनिहाय हे मेळावे होणार आहेत.शेवटच्या जोडण्यांसाठी टोकाचे प्रयत्नलोकसभा निवडणुकीत चुरस अनेक वेळा आपण पाहिली; पण इतकी ईर्षा कधीच नव्हती. काठावरची लढत असल्याने शेवटच्या टप्प्यात जोडण्यांसाठी दोन्ही बाजूंनी टोकाचे प्रयत्न सुरू आहेत.सोशल मीडियाच्या हत्याराला ‘धार’या निवडणुकीत जाहीर सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सोशल मीडियातून एकमेकांवर वार करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडलेली नाही. शेवटच्या टप्प्यात या माध्यमाचा प्रभावी ‘हत्यार’ म्हणून वापर करण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी उमेदवारांचे स्वतंत्र पथक असून एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत मतदारांत संभ्रम व बदनामी करून मत परिवर्तनाची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. जाहीर प्रचार जरी बंद झाला तरी मतदानापर्यंत हे ‘हत्यार’ उमेदवारांच्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक